Zeenat Aman | बॉलिवूड गाजवले पण खऱ्या आयुष्यात मात्र तिला तिच्याच नवऱ्याने फसवले. एक अशी दिग्गज अभिनेत्री जी आजही तिच्या आगळ्यावेगळ्या पण क्लासी स्टाईल स्टेटमेंटमुळे खूप चर्चेत असते. तिचे नाव आहे, झीनत अमान. हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री, आजही त्यांच्या स्टायलिश लूकमुळे त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत. जरी त्यांनी बॉक्स ऑफिस गाजवले असले तरीसुद्धा रिअल लाईफ मात्र अनेक अडथळे , दुःख आणि अडचणींनी भरलेली होती. असे असले तरीही आज ही अभिनेत्री तिचे आयुष्य दिलखुलासपणे जगत आहे. पण एक वेळ अशी आली होती, जेव्हा त्या त्यांच्या आयुष्यात पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या.
पहिल्या लग्नानंतर आयुष्य बदललं-
दिग्गज अभिनेत्री झीनत अमान (Zeenat Aman) यांनी मजहर खान यांच्याशी लग्न केले होते, पण त्यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलले. याबाबत स्वतः अभिनेत्रीने खुलासा केला आहे. झीनत अमान यांना दोन मुलेही आहेत. झीनत अमान यांनी आपल्या पहिल्या लग्नाबाबत बोलताना सांगितले होते की, त्यांना नंतर लग्न केल्याचा पश्चाताप झालेला. पण, दोन मुलं असल्यामुळे त्यांनी तब्बल 12 वर्षे नाते टिकवले.
लग्न करण्याचा निर्णय आणि पश्चाताप
याबद्दल बोलताना झीनत अमान (Zeenat Aman) म्हणाल्या की, “त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय माझा स्वतःचा होता. म्हणूनच मी विचार केला की, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तो पाळेन. मी ते दुरुस्त करण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा मी प्रेग्नेंट होते तेव्हा तो माझ्यासोबत नव्हता. तो काळ माझ्यासाठी खूप कठीण होता. नंतर, एका मासिकात बातमी आली की, त्यावेळी माझा नवरा दुसऱ्या महिलेसोबत होता आणि ती खरी होती.”
मुलासाठी नातं टिकवलं
यावर पुढे बोलताना झीनत अमान म्हणाल्या की, “जेव्हा मला मूल झालं, तेव्हा मला वाटलं की लग्न संपवावे, या नात्यातून बाहेर पडावे. पण नंतर मला वाटलं की, मुलाला नक्कीच संधी मिळावी. पण जेव्हा माझे मूल 5 वर्षांचे होते, तेव्हा मी एखादे काम करण्याचा विचार केला. पण मग, माझा पती मजहर आजारी पडला आणि माझा संपूर्ण दिवस त्याची काळजी घेण्यात जायचा.”
View this post on Instagram
18 महिने केली पतीची सेवा-
झीनत अमान यांनी सांगितले की, “मी इंजेक्शन द्यायला शिकलेले आणि ड्रेसिंग करायलाही शिकलेले. मी 18 महिन्यांपर्यंत त्यांच्यासोबतच राहिले. एवढेच काय तर, मी त्याच्या बॅग्सही बदलल्या. तेव्हा मी पूर्णपणे तुटलेले आणि त्या 12 वर्षांत कुणीच असे नव्हते की, जे मला येऊन विचारतील की, मी कशी आहे…”झीनत अमानच्या या खुलाश्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कठीण काळावर प्रकाश पडतो. त्यांच्या या संघर्षमय प्रवासातून अनेक महिलांना प्रेरणा मिळू शकते.