“महाराष्ट्राचा महानालायक कोण?, अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे पहिले येतील”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray l शिवसेना परान्मुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार युद्ध सुरु आहे. सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी बोललोच नव्हतो अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला उद्धव ठाकरेंनी केलेले आरोप फेटाळले आहेत.

महाराष्ट्राचा महानालायक कोण? :

यावर उद्धव ठाकरेंनी सनसनाटी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर तुफान हल्ला चढवला आहे. मात्र उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्ला चढवला केला. देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून दिल्ली जाण्याचा शब्द दिला होता. मात्र तो शब्द पाळला गेला नाही असं उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. त्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. आधी देवेंद्र फडणवीस यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. तर अशातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray l चंद्रशेखर बावनकुळे नेमके काय म्हणाले?

पालघर साधू हत्याकांडात उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प बसले आहेत, 100 कोटी वसुली रॅकेट चालवत तिथे कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना देखील घोटाळे केले आहेत. मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला, याला कोडगेपणा असे म्हणतात असा हल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला देखील कोडगेपणा म्हणतात. लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आहे त्यामुळे ते आता बडबडत आहेत. तसेच तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला त्याने फरक देखील पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की, अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

News Title – chandrashekhar bawankule Statement On uddhav thackeray

महत्त्वाच्या बातम्या

“लाज लज्जा सोडलेला कोडगा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस”, ‘त्या’ खोलीबद्दल ठाकरेंचा गौप्यस्फोट

या राशीच्या व्यक्तींनी दुचाकी वाहन चालवताना सावधानता बाळगावी

हवा फिरली?, ‘या’ एका गोष्टीत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दिली पहिल्यांदाच मात

“भाजपसोबत आल्यापासून आमच्या अदानी-अंबानींसोबतही ओळखी झाल्या”

काँग्रेसचेच चरित्र षडयंत्र रचण्याचे!, काँग्रेसच्या ‘त्या’ आरोपांवर धीरज घाटेंचं सडेतोड उत्तर