Maharashtra Weather l सध्या देशासह राज्यातील वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. अशातच मे महिन्यात सूर्य आग ओकणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. कारण राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
राज्यात उन्हाचा पारा वाढणार :
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात उन्हाचा पारा वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. अशातच राज्यातील मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवड्यांप्रमाणे या आठवड्यात देखील हवामान कोरड आणि उष्ण असणार आहे. त्यानंतर पुढील काही दिवसांत तापमान कमी होऊन थोड्या फार प्रमाणात दिलासा मिळू शकेल.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिणेकडील काही राज्यांना या आठवड्यात उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्रातील काही भागात या आठवड्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअस पार जाणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
Maharashtra Weather l या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा :
भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलं आहे. याशिवाय, आज कोकणात उष्ण आणि दमट हवामान असणार आहे. अहमदनगर, रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि नांदेड या भागांमध्ये आज उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमान सामान्यपेक्षा 5-6 डिग्री सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबईतील चेंबूर आणि पवई भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तसेच या भागात तापमान 37 डिग्री सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
News Title – Maharashtra Weather Updates
महत्त्वाच्या बातम्या –
महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी ‘इतक्या’ जागांवर विजय मिळणार? शरद पवारांनी थेट आकडाच सांगितला
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय
अभिजीत बिचुकले ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर; ‘या’ मतदार संघातून भरला अर्ज
शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळेल बक्कळ पैसा; जाणून घ्या कोणत्या राशींचे नशीब पालटणार?
धक्कादायक प्रकरणी अमोल कोल्हे पुरावे देणार, आढळराव राजकारणातून बाजूला होणार का?