जालना | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला वारंवार इशारा देऊन सुद्धा सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाहीये. त्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण सुरु केलं आहे.
जरांगे यांच्या उपोषणाचा 6 वा दिवस आहे. गेले काही दिवस जरांगेंनी अन्न पाण्याला शिवलेलं नाही. त्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर होत आहे. दुपारी उभे रहात असताना जरांगे पाटील स्टेजवर कोसळले. अनेकांनी त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी पाण्याचा घोट घेतला.
दरम्यान, त्यांना राजकीय नेते मंडळींनी देखील संपर्क करुन आंदोलन मागे घ्या, असं आवाहन केलं. मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही असं ते म्हणाले. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी मनोज जरांगे पाटलांना पत्र लिहिलं आहे.
अॅड प्रकाश आंबेडकरांनी पत्रात काय म्हटलं?
थोडक्यात बातम्या-
- मराठ्यांनी बीड पेटवलं!, शरद पवारांच्या खास आमदाराच्या घराला लावली आग
- जरांगे पाटील बोलले विषय खल्लास!, “आता हा आमदार निवडून येणार नाही!”
- शिंदेंचं टेन्शन वाढलं!, दुसऱ्या खासदारानंही सोडली खासदारकी, मोठं कारण समोर…
- मांढरदेवीचा कोप!!!… राजकारण्यांना दर्शन घेता येणार नाही! मोठं आहे कारण
- शिदें-फडणवीस सरकारची घटका भरली?, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल