सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांची चाणक्य नीती अनेकजण आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी वापरत असतात. राजकीय मंडळी एखादा डावपेच आखण्यासाठी खासकरून या नितीचा अवलंब करत असतात. त्यावेळी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजही तंतोतंत खऱ्या ठरत आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा माणूस जीवनात यशस्वी होतो आणि त्याच्या आयुष्यातील सर्व समस्या संपतात, अशी अनेकांची धारणा आहे. जीवनात यश मिळवण्यासाठी, सुख उपभोगण्यासाठी आणि संकटांपासून दूर राहण्यासाठी काही स्त्रियांपासून पुरूषांनी अंतर ठेवून राहायला हवे असे चाणक्य सांगतात.

आचार्य चाणक्य म्हणतात की, स्त्रीने कधीही गर्व करू नये. ज्या स्त्रीला तिच्या सौंदर्याचा किंवा कशाचाही अभिमान आहे अशा स्त्रीपासून नेहमीच दूर राहावे… कारण अहंकार स्त्रीसाठी धोकादायक ठरू शकतो. चाणक्य सांगतात की, जेव्हा एखादी स्त्री गर्विष्ठ होते तेव्हा माता लक्ष्मी आणि माता सरस्वती क्रोधित होतात. त्यामुळे घरातील सुख-समृद्धी नष्ट होऊन आर्थिक स्थिती बिघडते. म्हणूनच स्त्रीने अभिमान बाळगू नये.

अज्ञान

आचार्य चाणक्य यांची नीती प्रत्येक व्यक्तीसाठी लागू होते. ते म्हणतात की, कोणत्याही स्त्रीचे शिक्षित होणे खूप गरजेचे आहे. सुशिक्षित महिलाच चांगला समाज घडवू शकते. सुशिक्षित स्त्रीचा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. यातून ती समाजाच्या विकासात हातभार लावू शकेल. त्याचबरोबर स्त्री शिक्षित असेल तर ती मुलांचे संगोपन करण्यात चांगली असते. त्यामुळे अज्ञान असलेल्या स्त्रीपासून लांब राहणे केव्हाही चांगले.

Chanakya Niti | लोभी

लोभ केवळ स्त्रियांनाच नाही कोणत्याही व्यक्तीसोबत वाईट गोष्ट घडवू शकतो, असे चाणक्य नीती सांगते. त्यामुळेच आपले पूर्वज सल्ला देतात की, कोणत्याही व्यक्तीने लोभी राहू नये. लोभामुळे चांगली घरेही उद्ध्वस्त होतात आणि जर स्त्रीला लोभ वाटू लागला तर तिच्या घरातील सुख-समृद्धी नष्ट होते. नातेसंबंधांवरही परिणाम होतो आणि अनेकदा कुटुंबाला खूप तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे स्त्री-पुरुषांनी लोभी नसावे.

वेश्याव्यवसाय करण्यांपासून दूर राहा

आयुष्यात पुढे जायचे असेल तर पुरूषांनी अशा स्त्रियांच्या संपर्कात येऊ नये ज्यांचे अनेक पुरुषांशी संबंध आहेत, म्हणजेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया. या महिलांना फक्त स्वतःचा फायदा दिसतो आणि त्यांना फक्त पैसा हवा असतो. यासाठी त्या कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी तुमचे घर पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. त्यामुळे वेश्यांपासून नेहमी दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.

कपटी स्वभाव

चाणक्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही व्यक्तीने दुष्ट स्वभाव असलेल्या, कपटीपणाने वागणाऱ्या स्त्रीपासून दूर राहावे. असे मानले जाते की अशी स्त्री तिच्या फायद्यासाठी काहीही करायला लावू शकते, त्यामुळे अशा स्त्रीशी कधीही मैत्री करू नये. वाईट स्वभावाची स्त्री जेव्हा तिच्या स्वार्थाची वेळ येते तेव्हा ती समोरच्याचे नुकसान करण्यास मागेपुढे पाहत नाही.

News Title- Chanakya Niti advises to stay away from women who are ignorant, greedy, prostitutes and hypocrites
महत्त्वाच्या बातम्या –

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट

दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला

पुरुषांमध्ये ‘हे’ 3 गुण असतील तर महिला होतात आकर्षित, चाणक्यांनी ठेवलंय लिहून

मोठी बातमी! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय

iPhone वापरणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!