‘खरं तर मला अमृताला सर्वात पहिला…’, घरातून बाहेर पडताच हे काय बोलून गेला प्रसाद

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ‘बिग बाॅस’ हा टीव्हीवरली सर्वात लोकप्रिय कार्यक्रम आहे. त्यातच आता बिग बाॅस मराठी सीझन 4(Bigg Boss Marathi) एका रंजक मोडवर आलं आहे. हा सीझन आता शेवटच्या टप्प्यावर पोहचला आहे, त्यामुळं विजेता कोण ठरेल याकडं सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

त्यातच आता अगदी शेवटच्या टप्प्यात आल्यावर स्पर्धक असलेला अभिनेता प्रसाद जवादे(Prasad Jawade) बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडला आहे. त्यामुळं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्याकडून अनेकजणांना विजेतेपदाची आशा होती.

प्रसाद बिग बाॅसच्या घरातून आल्यानंतर अगदी मनमोकळेपणाने तेथील गोष्टींबाबत बोलत आहे. त्यातच प्रसादनं एका वृत्तनाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता देशमुखसोबतच्या(Amruta Deshmukh) नात्याबद्दलही सांगितलं आहे.

बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यावर तुला अमृता देशमुखला भेटायला आवडेला का ?, असा प्रश्न मुलाखतीदरम्यान त्याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला, का नाही, खर तर मला सर्वात पहिला फोन अमृताला करायला आवडेल.

गेल्या काही दिवसांपासून अमृता माझ्या जीवनातील आश्चर्यकारक भाग बनली आहे. सुरूवातीपासूनच बिग बाॅसच्या घरात माझी बाजू घेणारी कोण असेल तर अमृताच आहे, असंही यावेळी प्रसाद म्हणाला.

दरम्यान, बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्रसादनं सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यानं चाहत्यांचे, त्याला वोट्स देणाऱ्याचे, त्याला साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.

महत्वाच्या बातम्या-