Chanakya Niti | सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे सल्लागार, भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय तत्वज्ञानी, राजकीय धोरण निर्माता, शिक्षक आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. चाणक्य यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर काही न काही तत्वज्ञान सांगितलं आहे.
जीवनात येणाऱ्या अडचणी असो किंवा जीवनात मनुष्याने काय करावे आणि काय करू नये, याबाबत त्यांनी काही तत्वे सांगितली आहे. त्यांच्या या तत्वांचे पालन केले तर जीवनातील कोणत्याही अडचणीतून तुम्ही सहजरीत्या बाहेर पडू शकता.
निती शास्त्रामध्ये आचार्य चाणक्य यांनी अशा लोकांबद्दल सांगितलं आहे जे आयुष्यभर दुःखी राहतात. या लोकांबद्दल ते म्हणतात की, असे व्यक्ती त्यांच्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत आणि सुधारू शकत नाहीत. जाणून घेऊया अशा प्रकारच्या व्यक्तींबद्दल.
आत्मद्वेषात् भवेन्मृत्यु: परद्वेषात् धनक्षय:।
राजद्वेषात् भवेन्नाशो ब्रह्मद्वेषात् कुलक्षय:।।
आचार्य चाणक्य (Chanakya Niti ) त्यांच्या नीतीशास्त्रातील एका श्लोकात म्हणतात की, जो व्यक्ती आपल्या आत्म्याबद्दल द्वेष ठेवतो त्याचा नाश होतो. मनुष्याचा आत्मा हा नश्वर आहे. म्हणून, आत्म्याबद्दल द्वेष ठेवू नये. त्याचप्रमाणे जे लोक इतर लोकांच्या पैशाबद्दल द्वेष करतात ते त्यांच्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकत नाहीत. काही ठिकाणी’आत्मद्वेषात्’ ऐवजी ‘आप्तद्वेषात्’ हा शब्दही वापरला आहे. ‘आप्त’ म्हणजे विद्वान, ऋषी-मुनी आणि सिद्धपुरुष. जे लोक खरे बोलतात आणि वागतात ते आप्त असंही काही ठिकाणी म्हटलं आहे.
माता च कमला देवी पिता देवो जनार्दनः।
बान्धवा विष्णुभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम्॥
याच अध्यायाच्या चौदाव्या श्लोकात आचार्य चाणक्य (Chanakya Niti ) म्हणतात की, ज्यांची आई ममतारूपी माता लक्ष्मी आणि पिता जगाचे पालनहार भगवान विष्णू आहेत आणि त्यांचे भक्त भाऊ-बहीण आहेत ते लोक धरतीवरच स्वर्ग निर्माण करतात. असे लोक जीवनात खूप यश संपादन करतात. ते नेहमी सुखी असतात.
एकंदरीत आपल्या आई-वडिलांचा आदर करणे, बहीण-भावात आदराचे प्रेमाचे संबंध असणे मनुष्याला सुखी बनवते. असे व्यक्ती आपले ध्येय गाठण्यात कमी पडत नाही.त्याला आपल्या कुटुंबाचा संपूर्ण पाठिंबा असतो. त्यामुळे तो जीवनात नेहमी सुखी राहतो.
News Title- Chanakya Niti Such people always unhappy and troubled
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! वसंत मोरे यांना ‘या’ पक्षाकडून उमेदवारी जाहीर
रवि राणांचा बच्चू कडूंवर पलटवार, थेट डोनाल्ड ट्रम्पशी केली तुलना, म्हणाले…
“रोहित शर्माला पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार करा”
“तो डाव अशोक चव्हाण यांचाच”; काँग्रेस नेत्याच्या आरोपाने खळबळ
निवडणूक काळात WhatsApp मेसेज पाठवताना काळजी घ्या, नाहीतर तुमच्यावर होऊ शकते कारवाई