धनंजय मुंडेंची सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना मिळणार इतक्या रुपयांचा लाभ!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | राज्य मंत्रिमडळाची बैठक आज पार पडली. या बेठकीत शेतकऱ्यांसाठी (Farmer) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील पिक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात सुमारे 1700 कोटी रुपये पिकविमा अग्रीम वितरण करण्यास मंजूरी दिली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी

या विम्याचे पैसे संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यासाठी विमा कंपन्यांनी सुरुवात केल्याने बहुतांश जिल्ह्यात दिवाळीपूर्वीच पिकविम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे. या विम्याचा लाभ 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी दुसरा मोठा निर्णय म्हणजे विदर्भात 5 ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या निर्णयामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

राज्य सरकारने राज्यातील निर्यातीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे. या धोरणाचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे.

दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज शेतकऱ्यांना दिलासा देणारे दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. याशिवाय विविध विभागांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सरकार आता नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले उचलणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी ‘या’ नेत्याची वर्णी

“शितले जेलमध्ये चकली बनवायची वेळ आली तर….”

Rain Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

सेलिब्रेंटींसोबत दिसणारा Orry आहे खूप श्रीमंत; संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘लग्न झाल्यावर माणूस रोज रोज करतो’; मुख्यमंत्र्याचं धक्कादायक वक्तव्य