मुंबई | शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांना घरी बसूनच पैसे कमावता येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी सरकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेचे नाव ‘सोलर पंप योजना’ असे आहे.
सरकार सौरऊर्जेच्या वापरासाठी मोठी पावले उचलत असून सरकार अनेक योजना राबवत आहे.अनेकांना याबाबत माहिती नसते. माहितीच्या अभावामुळे लोक या योजनांचा लाभ घेता येत नाही.
सौरपंप बसवून शेतकरी सिंचन करून पैसेही कमवू शकतात. यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. त्यामुळे वीज आणि डिझेलसह सिंचनाच्या खर्चातही मोठा दिलासा मिळेल.
या योजनचा लाभ घेण्यासाठी तुम्ही http://pmkusum.mnre.gov.in ला भेट देऊ शकता. तसेच 1800-180-3333 या टोल फ्री क्रमांकावर जाऊन तुम्ही इतर माहिती मिळवू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्ही जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधू शकता.
दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्ही 15 लाख रुपयांपर्यंत वीज निर्माण करू शकता. विभाग 3 रुपये 7 पैसे दराने उत्पादित वीज खरेदी करेल.
शेतकऱ्यांना वार्षिक 4 ते 5 लाखांचं उत्पन्न मिळू शकतं. त्याचप्रमाणे वीज विक्रीवर दरवर्षी एकरी 60 हजार ते 1 लाख रुपये मिळतील.
महत्त्वाच्या बातम्या-
- सतर्क! झिका व्हायरसचा आणखी एक रूग्ण
- ‘या’ ईलेक्ट्रिक स्कूटर देतात 320 किमी पर्यंत रेंज
- मोठी बातमी! ‘या’ लोकांना भरावा लागणार नाही कर
- “छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे होते”
- टाटांनी करून दाखवलं; एअर इंडियाच्या इतिहासातील सर्वात मोठी डील?