Manoj Jarange Patil | गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा समाजासाठी सरकारकडे आरक्षणाची मागणी करताना दिसत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या अशी त्यांची मागणी आहे. सगेसोयरेची अंमलबजावणी करा अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत.
अनेक दिवसांपासून (Manoj Jarange Patil) मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. काही दिवसांआधी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी जातिवाचक वक्तव्य केलं त्यावरून पुण्यातील ब्राह्मण समाजाने संताप व्यक्त केला होता. तर दुसऱीकडे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या बाजूने बोलत होते. अशातच आता मनोज जरांगे यांनी सोलापुरात जात मराठा बांधवांशी संवाद साधला आहे.
मनोज जरांगे पाटील हे सोलापुरातील बार्शी तालुक्यातील वैराग येथे जात त्यांनी मराठा बांधवांशी संवाद साधला. ते सकाळी 11 वाजता उपस्थित राहिले आहेत. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे. यावेळी त्यांनी बोलत असताना पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मी तुम्हाला काहीच बोललो नाही, तरीही तुम्हाला माझे शब्द लागले आहेत. मग जेव्हा अंतरवाली सराटीमध्ये माझ्या आई- बहिणींवर लाठी हल्ला झाला, डोकी फुटली तेव्हा तुम्हाला काही वाटले नाही?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
“लाज वाटली नाही”
मी तुम्हाला बोललो तर तो एक शब्द तुम्हाला इतका लागला. पण आई बहिणींच्या लाठी हल्ल्यामुळे त्यांना आजही शेतात जाता येत नाहीत. त्यांचे पाय मोडले आहेत. त्यावेळी तुम्हाला थोडी कशी लाज वाटली नाही, असा घणाघात मनोज जरांगे यांनी केला आहे.
“तर चोराला टेन्शन येईल”
काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. आता मनोज जरांगे यांच्यावर एसआयटी लावण्यात आली आहे. यावर मनोज जरांगे यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. मी एसआयटी चौकशीला अजिबात घाबरत नाही. मी कोणाचं खाल्लं नाही. उलट माझं पाकिट चोरानं मारलं तर चोराला टेन्शन येईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी टोला लगावला आहे.
News Update – Manoj Jarange Patil vs Devendra Fadanvis news Update
महत्त्वाच्या बातम्या
मनोज जरांगेंनी फडणवीस यांना दिली आत्याची उपमा, म्हणाले…
‘अडीचशेच्या पार तुम्ही आमच्या खासदारांमुळे गेला होता’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
“वादग्रस्त वक्तव्ये टाळा, कारण हे जग…”, लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र
शाहरुख खानने दिला जय श्रीरामचा नारा, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
पुण्यात नेमकं चाललंय तरी काय?; पोलिस उपनिरीक्षक असल्याचं सांगत केलं धक्कादायक कृत्य