अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

मुंबई | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या राज्यभर मराठा आरक्षणासाठी दौरा करत आहेत. दरम्यान, जरांगे पाटील यांची काल पुण्यातील खराडी येथे सभा पार पडली. त्यानंतर त्यांची आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात सभा झाली.

सभेत बोलत असताना जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येेथे झालेल्या लाठीचार्जवरुन गंभीर आरोप केला आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीमध्ये केलेल्या हल्ल्याचा कट प्रशासनानेच रचला, असं जरांगे पाटील म्हणाले.

जरांगे पाटील काय म्हणाले?

आधीही आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. आमच्यावर हल्ला झाला. मार आम्हाला लागला होता. कट हा प्रशासनानेच रचला होता. आमच्यावरच 120 ब आणि 360 चे गुन्हे दाखल केले होते. आम्ही शांततेत आंदोलन करत होतो.

कायद्याचे नियम पाळून आंदोलन करत होतो. आमच्यावरच हल्ले केले. आमच्यावरच अन्याय झाला, असं देखील जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटील यांनी सभेवेळी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सडकून टीका केली.

सभेनंतर जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. अंतरवली सराटीतील हल्ल्याप्रकरणी ज्यांना निलंबित केलं, त्यांना थोड्या दिवसासाठी निलंबित केल्याची माहिती मिळते. त्यांना जास्तीच्या पोस्टिंग देऊन रुजू केलं आहे.

सरकारला जनतेने गादीवर बसवलंय की अधिकाऱ्यांनी? तुम्हाला कोण महत्त्वाचं आहे? तुम्ही अधिकाऱ्यांना सांभाळत आहात. सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.

थोडक्यात बातम्या – 

जरांगेंनी केला नवा खुलासा; राजकीय वर्तुळात खळबळ

पुण्यात धडकी भरवणारा अपघात, पाहा व्हिडीओ

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा झटका! 

मोठा गौप्यस्फोट: ललित पाटील प्रकरणात ‘या’ बड्या नेत्यांची नावं 

मराठा आरक्षण कोणी लपवून ठेवलं?, जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य