सातारा | बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकले कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. दरम्यान पुन्हा एकदा बिचुकले चर्चेचं कारण बनले आहेत. बिचुकले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं असून यामध्ये त्यांनी मोठी मागणी केली आहे.
पत्रात काय लिहिलं आहे?
2014 पासून महाराष्ट्रात भाजपची सत्ता असून मुख्यमंत्र्यांनी देखील याचा विचार करून 18 नोव्हेंबर रोजी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि दिवाळीनिमित्ताने सर्व महाराष्ट्रवासीयांना 500 रुपयात सिलेंडर उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.
जित पवार यांनी देखील यामध्ये लक्ष घालून 500 रुपयात सिलेंडर महाराष्ट्रातील जनतेला उपलब्ध करावा, अशी मागणी अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukle) यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
छत्तीसगड विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून (Bjp) मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. बेराजगार युवक आणि महिलांसाठी सवलतींची खैरात करण्यात आली आहे.
छत्तीसगडच्या पार्श्वभूमीवर बिचुकलेंनी महाराष्ट्रात देखील सिलेंडर स्वस्तात देण्याची योजना सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केलीये.
महत्त्वाच्या बातम्या-
“मर्दाची अवलाद असेल तर…”; उद्धव ठाकरे भडकले
मुकेश अंबानींनी बायको नीता अंबानींना दिलं ‘हे’ सर्वात महागडं गिफ्ट!
‘त्या भेटीत अनेक…’; अपक्ष आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
पोलीस कोठडीत ललित पाटील याची प्रकृती बिघडली!
“उद्धव ठाकरेंना अडवताय, तुमची लायकी काय?”