Aishwarya Rai | ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबदल दिवसेंदिवस नवनवीन माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यात खटके उडत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या दोघांनी अद्यापही या गोष्टीवर भाष्य केलं नाहीये. दरम्यान काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या आणि अभिषेक यांची लेक आराध्याच्या एका कार्यक्रमात संपूर्ण बच्चन कुटुंब उपस्थित होतं.
Aishwarya Rai आणि अभिषेक एकत्रित नव्हते-
आराध्या हीच्या कार्यक्रमाला ऐश्वर्या रायसह (Aishwarya Rai) बच्चन कुटुंब एकत्रित उपस्थित होते. दरम्यान यावेळी ऐश्वर्या आणि अभिषेकने वेगवेगळ्या गाडीतून एन्ट्री केल्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. मात्र याबरोबरच अनेक कारणं आहेत ज्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये सर्वकाही ठिक नसल्याचं पाहयला मिळत आहे.
ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक अनेक वेळा एका कार्यक्रमात दिसले. मात्र, या दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाल्याचं चित्र पाहयला मिळत आहेत. एकदा एका कार्यक्रमात ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्यामध्ये पापराझीसमोरच वाद पेटला होता.
एका चित्रपटाच्या प्रिमियर शोओच्या वेळेस, ऐश्वर्याला अभिषेकसोबत फोटो काढायचा होता मात्र, पापराझिला ऐश्वर्या हिच्या एकटीचे फोटो काढायचे होते. त्यामुळे अभिषेकला ही गोष्ट लक्षात आली आणि तो ऐश्वर्याला म्हणाला की, ‘तुझा तु फोटो काढ’ आणि तिथून तो निघून गेला.
Aishwarya Rai | नेमकं काय घडलं?
ऐश्वर्या आणि अभिषेक मनीष मल्होत्राच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी देखील काही कारणावरुन हे दोघे एकमेकांवर नाराज होते. जेव्हा पापारीझीने या दोघांना फोटो एकत्रित फोटो काढण्यास सांगितले तेव्हा ऐश्वर्या आणि अभिषेक लांब उभारुन फोटो काढतानाचं चित्र पाहायला मिळालं होतं.
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यामधील वादामुळे अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यामध्ये देखील दुरावा आल्याचं सांगितलं जात आहे.
News Title : aishwarya rai abhishek sepration this are the reason
थोडक्यात बातम्या-
Share Market | झुनझुनवालांनी ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 14,428 कोटी!
‘तिच्यासारखी कोणी भेटलीच नाही’; पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना Ratan Tata भावूक
Manoj Jarange राजकारणात एन्ट्री करणार?; जरांगेंनी अखेर सांगितलं
Captain Vijayakanth | मोठी बातमी! बड्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन