Bollywood News | अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता सलमान खान यांची प्रेमकहाणी ही बॉलिवूडमधील सर्वात चर्चित प्रेमकहाण्यांपैकी एक कहाणी आहे. दोघांमध्ये तब्बल 9 वर्षे प्रेमसंबंध होते, 2002 साली त्यांचं ब्रेकअप झालं. नंतर ऐश्वर्यानं बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं आणि स्वतःचा सुखी संसार सुरु केला. आता ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन (Abhisekh Bachchan) यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत असताना सलमान आणि ऐश्वर्याच्या प्रेमकहाणीला देखील उजाळा मिळत आहे.
सलमान आणि ऐश्वर्याची प्रेमकहाणी (Salman Khan-Aishwarya Rai Loveship) शेवटपर्यंत टिकली नाही, त्यांचं ब्रेकअप जगप्रसिद्ध आहे, मात्र दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत अनेकांना फारशी माहिती नाही. दोघांच्या ब्रेकअपची अनेक कारणं सांगितली जातात.
कसे आले होते दोघे एकत्र?-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, संजय लीला भंन्साली यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam) या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात जवळीक वाढली होती. त्यानंतर त्यांना अनेकदा एकत्र पाहिले जाऊ लागले. मात्र, लवकरच सलमान आणि ऐश्वर्या (Aishwarya Rai) यांच्यात तणाव आणि भांडण-तंटे होऊ लागल्याची बातम्या बाहेर येऊ लागल्या होत्या
सलमानला करायचं होतं लग्न-
सलमान खान आणि ऐश्वर्या रायचा ब्रेकअप कसं झालं?, याबद्दल मीडियामध्ये वेगवेगळे दावे केले जातात. त्यापैकी एक दावा असा आहे की, सलमान खान ऐश्वर्या रायबाबत फार पजेसिव्ह होता आणि त्याला तिच्याशी लग्न करायचं होते. सलमानला ऐश्वर्या रायकडून लग्नासाठी कमिटमेंट हवं होतं. मात्र, ऐश्वर्या यासाठी तयार नव्हती. या कारणामुळे सलमान आणि ऐश्वर्या यांच्यात तणाव वाढत गेला.
खरंतर, ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) लग्न करुन संसार करण्याऐवजी चित्रपटांमध्ये काम करू इच्छित होती आणि इंडस्ट्रीत आपले स्वतःचे एक स्थान निर्माण करु इच्छित होती. म्हणूनच तीने सलमान खानसोबत कोणत्याही प्रकारची कमिटमेंट केली नव्हती.
सलमानच्या भावांसोबत रहायला नकार!-
दुसरीकडे, काही दावे असेही केले जातात की, ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) काही अशा अटी सलमान खानसमोर ठेवल्या होत्या, ज्यामुळे त्यांच्यात तणाव वाढत गेला. त्या अटींमध्ये सलमान खानने आपल्या कुटुंबासोबत राहू नये आणि आपल्या भावांच्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवू नयेत, अशी अट घातली होती. असे म्हणतात की, या सर्व गोष्टींमुळे पुढे जाऊन सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचा ब्रेकअप झाला.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपची अनेक कारणं असू शकतात. या दोन स्टार्सच्या ब्रेकअपने बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली होती. या ब्रेकअपमुळे दोन्ही स्टार्सच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही मोठा परिणाम झाला. सलमानने लग्नच केलं नाही तर ऐश्वर्याचं अभिषेक बच्चनसोबत झालेलं लग्न सध्या घटस्फोटाच्या बातम्यांनी चर्चेत आहे.
News Title: Aishwarya rai salman khan breakup reasons
महत्त्वाची बातमी-
Share Market | झुनझुनवालांनी ‘या’ कंपन्यांच्या शेअर्समधून कमावले 14,428 कोटी!
‘तिच्यासारखी कोणी भेटलीच नाही’; पहिल्या प्रेमाबद्दल बोलताना Ratan Tata भावूक
Manoj Jarange राजकारणात एन्ट्री करणार?; जरांगेंनी अखेर सांगितलं
Captain Vijayakanth | मोठी बातमी! बड्या अभिनेत्याचं कोरोनामुळे निधन