सलमानमुळे घेतलेल्या ‘त्या’ निर्णयाचा ऐश्वर्याला आजही होतोय पश्चाताप!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. एकेकाळी यांची जोडी प्रचंड चर्चेत होती. दोघांना सोबत बघून चाहतेही खूप आनंदी होते. लवकरच ते लग्न करतील, अशा तेव्हा चर्चा होत्या. मात्र काही कारणांनी त्यांच्यात भांडण झाल्याचं म्हटलं जातं.

सलमान ऐश्वर्यावर सतत शंका घ्यायचा. इतकंच नाही तर तो सतत तिला शिवीगाळही करायचा असंही इंडस्ट्रीमध्ये म्हटलं जातं. सलमान दारूही खूप प्यायचा. त्याच्या या सवयीमुळेच ऐश्वर्याने त्याला सोडलं. पुढे ऐश्वर्याने अभिषेक सोबत लग्न करत संसार थाटला. मात्र, सलमान अजूनही सिंगलच आहे.

चाहते सलमान लग्न कधी करणार याची वाट बघतच आहेत. मात्र, अजूनही सलमान ऐश्वर्याला विसरला नाही, म्हणूनच तो लग्न करत नसल्याच्या चर्चा होतात. आता अशीच एक बातमी समोर आली आहे. ज्यात ऐश्वर्याला सलमानमुळे घेतलेला एक निर्णय खूप महागात पडल्याचं म्हटलं जातंय. या निर्णयाचा ऐश्वर्याला आजही पश्चाताप होतोय.

सलमानमुळे ऐश्वर्याने सोडला ‘तो’ चित्रपट

रिपोर्टनुसार ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटासाठी दीपिका ऐवजी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) ही पहिली पसंत होती. 2003 मध्येच बाजीराव मस्तानी चित्रपटाची घोषणा झाली. यात अगोदर रणवीर सिंह ऐवजी सलमान खानला काम करण्याची ऑफर होती. मात्र सलमानला यात न घेतल्याने ऐश्वर्याने थेट चित्रपटालाच नकार दिला होता.

ऐश्वर्याला सलमान खानसोबत पुन्हा मोठ्या पडद्यावर काम करायचे होते. मात्र, अचानक रणवीरचे नाव या चित्रपटासाठी फायनल झाले. त्यामुळे तिने यात काम करण्यास नकार दिला होता. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. ऐश्वर्याला या चित्रपटाला नकार देणे खरोखरंच खूप जास्त महागात पडल्याचं दिसतं.

सलमानच्या प्रेमात आकंठ बुडाली होती ऐश्वर्या

या चित्रपटाने 356 कोटींची कमाई केली. या चित्रपटाला नकार दिल्याने ऐश्वर्याला आजही याचा पश्चाताप होतो, असं म्हटलं जातं. दरम्यान, 1990 च्या दशकात सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत होत्या. पण दोन वर्षांच्या नात्यानंतर सलमानच्या वृत्तीमुळे ऐश्वर्या आणि सलमानचं ब्रेकअप झालं. त्यांनी सोबत अनेक चित्रपटात काम केलं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ या सुपरहिट चित्रपटातील त्यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती.

सध्या ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात काहीतरी बिनसलं असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच आता सलमान खान आणि ऐश्वर्याचा हा किस्सा चर्चेत आलाय.

News Title- Aishwarya Rai rejected Bajirao Mastani film for Salman Khan

महत्त्वाच्या बातम्या –

बारामतीचा उमेदवार ठरला!; अखेर राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा खुलासा

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी

‘हा’ शेअर करेल मालामाल; गुंतवणूकदारांना अंत्यत मोलाचा सल्ला

आमदार संजय गायकवाड यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल!

‘या’ भागात जोरदार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा महत्वाचा इशारा