मुंबई | राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, बदलापूरसह राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
गहू, हरभरा, मका हे पीक जमीनदोस्त झाले असून, सोंगणीला आलेल्या या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला घास पुन्हा अस्मानी संकटाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यामध्ये सर्व दूर काल सायंकाळ पासून काही ठिकाणी जोराचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे.
पावसामुळे शेतात असलेल्या गहू, चना, संत्रा, आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. तसेच उकाड्यापासून त्रस्त शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा, असं चित्रही पाहायला मिळालं.
जळगाव जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. रब्बी पिकांचं नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ‘पुन्हा जीभ हासडण्याची भाषा कराल तर…’; ‘या’ नेत्याचं ठाकरेंना उत्तर
- अर्थव्यवस्थेबाबत रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
- ‘आता त्यांचा रोजचा थयथयाट सुरु आहे’; शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
- पुढचे 24 तास महत्त्वाचे; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता
- अंबानींच्या ड्रायव्हरचा पगार ऐकून थक्क व्हाल?