Chanakya Niti | मानवाला त्याच्या जीवनातील महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आचार्य चाणक्य (Chanakya Niti) नेहमी मार्गदर्शन करत असतात. मग ते विवाहाबाबत असो वा जीवनावश्यक गोष्टींबाबत असो. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) नेहमी चांगलं मार्गदर्शन करत असतात.
आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी लग्नाच्या नात्याबाबत मार्गदर्शन केलं आहे. मानवाच्या आयुष्यामध्ये लग्न हा महत्त्वाचा घटक आहे. लग्न करत असताना आचार्य चाणक्य यांनी कोणती काळजी घ्यावी? जोडीदारामध्ये असणाऱ्या कोणत्या बाबींचा मानवाने विचार करावा? हे आचार्य चाणक्य यांनी सांगितलं आहे.
वयात फारसा फरक नसावा
पती आणि पत्नी यांच्या वयात अधिक फरक नसावा. त्यांच्या वयामध्ये अधिक फरक असेल तर पती आणि पत्नीच्या बैद्धिक विचारात तफावतता जाणवेल. दोघांच्या मानसिकतेत फरक जाणवेल. यामुळे दोघांना आपापल्या पातळीवर एकमेकांना अॅडजेस्टमेंट करून घेणं. कठिण होऊन बसेल.
लग्नाच्या आधीच विचार करा
विवाह हा मनुष्याच्या आयुष्यामध्ये आनंद द्विगुणीत करणारा महत्त्वाचा पल्ला आहे. तो प्रत्येक मानवाला पार करावा लागतो. त्यासाठी मानवाने लग्नाच्या आधीच विवाह करताना जोडीदाराच्या आवडी निवडी, स्वभाव एकमेकांना असणारी गरज याचा सर्व बाजूनं विचार करावा. नाहीतर हल्ली अनेक ठिकाणी घटस्फोटाचं प्रमाण वाढू लागलं आहे.
पत्नीने कर्तव्य पार पाडावं
पत्नीनं आपल्या पतीचे सर्व हक्क कर्तव्य पार पाडावं. पती आणि पत्नीचा एकमेकांवर अधिकार असतो. पती नाराज असेल तर पत्नीनं आपल्या पतीला खूश ठेवण्यासाठी कोणतीही कसर सोडू नये, असं आचार्य चाणक्य सांगतात.
विवाह होण्याआधी तरूण-तरूणींनी वरील मुद्दे लक्षात घ्यावेत. यामुळे विवाह करण्याआधी चाणक्यांनी केलेलं मार्गदर्शन अंगीकारावं. त्याचा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक बदल होईल, असं चाणक्य सांगतात.
News Title – chanakya niti Tips About Marriage Couple
महत्त्वाच्या बातम्या
महायुतीचा मोठा निर्णय; जानकरांचा आनंद गगनात मावेना
‘कपड्याचं माप द्यायला गेलो तेव्हा…’; शिव ठाकरेने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव
“12 एप्रिल रोजी 12 वाजता पवारांचे 12 वाजवणार”; विजय शिवतारेंचं अखेर ठरलं?
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आणखी एक धक्का!
वडील म्हणून ती गोष्ट राज ठाकरेंनी आजवर केली नाही – अमित ठाकरे