तेलघाले आव्हाड!, रुपाली चाकणकर यांच्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rupali Chakankar | पाषाणालाही पाझर फुटतो पण तुम्हाला माया, आपुलकी काहीच राहिले नाही तुम्ही भावना शून्य झाला आहात, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केली होती. यानंतर आता अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादीचे दोन गट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अनेकदा काही न काही कारणांवरून यांच्यात वाद होत असतात. आता रूपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा!

“अजित दादा यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढून जनतेची दिशाभूल करू नका. जनता हुशार आहे. यांना राज्यात द्वेष पसरवून समाधान झालं नसावं म्हणून, पवार कुटुंबात टेंभा घेऊन आग लावण्याचे काम करत आहेत.”, असा आरोप रुपाली चाकणकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे.

एवढेच नाही तर पुढे त्या म्हणाल्या की, “जनतेला दुधात मिठाचा खडा टाकणारे आव्हाड सहज कळतात. त्यामुळे तेलघाले आव्हाड तुम्ही आता गप्पच बसा!”, असा टोलाही चाकणकर (Rupali Chakankar) यांनी लगावला आहे. या आरोपांनंतर आता आव्हाड काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले होते?

मी बारामतीत हे केलं, बारामतीत मी ते केलं असे म्हणता. पण, तुम्हाला बारामती दिली कोणी? ते बारामती भलत्याला देऊ शकले असते. कुणी आणली बारामतीत MIDC? कुणी आणला CSR फंड? तुम्हाला माहित होतं का CSR फंडबद्दल? शरद पवारांनी उद्याच मरावं, अशी तुम्ही इच्छा दिसतेय. या महाराष्ट्राला कळेल की काय माणूस आहे हा की आपल्या काकांच्या मृत्यूची वाट बघतोय.याला राजकारण म्हणतात काय?, असा सवाल आव्हाड यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना केला होता. यावरूनच रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आव्हाड यांना प्रत्युत्तर दिले आहे.

आम्हाला लाज वाटतेय तुमच्याबरोबर काम केल्याची. आंतरराष्ट्रीय कंपन्या बारामतीत येतात, जागतिक दर्जाचे नेते बारामतीला येतात ते तुमच्यामुळे येतात का? ते तुम्हाला भेटायला येतात काय?, एकदा तुमची उंची तर ओळखा. असा टोलाही आव्हाड यांनी अजित पवार यांना लगावला. ज्या माणसांनी तुम्हाला राजकारणात आणलं. ज्यांनी तुम्हाला मांडीवर बसविले. त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण म्हणताय म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयी ही म्हणता येणार नाही, तुम्ही भावनाशून्य झाला आहात,असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला.

News Title-  Rupali Chakankar allegations on Jitendra Awhad

महत्त्वाच्या बातम्या –

ऑफिसला या तरच पगार वाढेल नाही तर…; TCS ने कर्मचाऱ्यांसमोर ठेवली मोठी अट

Shubman Gill ची Team India तून हकालपट्टी होणार होती; घरच्यापर्यंत बातमी गेली पण…

“मला प्रसिद्धीची गरज नाही, माझा हेतू…”, ट्रोलिंगवर Poonam Pandey चे स्पष्टीकरण

Hate Speech | गुजरातमध्ये मौलानाचे प्रक्षोभक भाषण; मुफ्ती सलमान अझहरींना मुंबईतून ताब्यात घेतले

Crime News | पत्नीवर संशय, 12 वर्षे बंद खोलीत डांबलं; शौचालयात जाण्यासही बंदी, पोलिसांनी केली सुटका