इतक्या वर्षांनंतर आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला ‘वेळ खूप…’

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

The Great Indian Kapil Sharma Show | कपिल शर्मा हा आपल्या विनोदासाठी नेहमी चर्चेत असतो. त्याच्या विनोदाची चर्चा ही केवळ देशातच नाहीतर जगभरात आहे. जगभरात त्याचा चाहतावर्ग आहे. कपिल शर्मा नेहमी कोणत्या न् कोणत्या कारणाने चर्चेत असतो. नेटफ्लिक्सवरील द ग्रेट इंडियन कपिल शोमध्ये बॉलिवूडचा अभिनेता आमिर खानने (The Great Indian Kapil Sharma Show) उपस्थिती दर्शवली. त्यावेळी कपिलने त्याच्या स्टाईलने आमिर खानला काही प्रश्न केले. आमिरने त्याची उत्तरंही दिली. (The Great Indian Kapil Sharma Show)

अभिनेता आमिर खान हा कोणत्याही अवॉर्ड शोमध्ये दिसत नाही. कोणत्याही पार्टीमध्ये, कोणत्याही कार्यक्रमामध्ये दिसत नाही. नुकताच कपिल शर्माचा द ग्रेट इंडियन कपिल शोच्या (The Great Indian Kapil Sharma Show) एपिसोडचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. याशोमध्ये आमिर खानने उपस्थिती लावली असून कपिलने आमिरला त्याच्या तिसऱ्या विवाहाबाबत प्रश्न केला. तसेच शेवटी कपिल शर्मा “तू सेटल कधी होणार आहेस?”, असा प्रश्न आमिर खानला करतो. त्यावर अमिरच्या चेहऱ्याचे हावभाव बघण्यासारखे होतात.

यावेळी आमिर खान बोलत असताना आपल्या सिनेमांबाबत सांगतो. आपल्या मुलांबाबत सांगतो. माझे मागील दोन सिनेमे हे फ्लॉप गेलेत. तसेच घरातील कुटुंबाविषयी बोलत असताना त्यांनी सांगितलं की, माझी मुलं माझं काही ऐकत नसल्याचं आमिर खान म्हणाला. आमिरच्या वक्तव्याने एकच हशा पिकलेला पाहायला मिळाला. कपड्यांवरून देखील आमिर खान कपिलच्या शोमध्ये बोलला. त्यावेळी अर्चना पुरण सिंहने कपडे चांगले असल्याचं सांगितलं. तेव्हा आमिर म्हणाला की मी शॉर्ट्सवर येणार होतो, पण मला त्यांनी जीन्स घालायला सांगितली, असं आमिर म्हणाला.

आमिर कोणत्याही कार्यक्रमात दिसत नाही?

आमिर खान हा कोणत्याच पुरस्कार सोहळ्याला दिसत नाही. कोणत्याही कार्यक्रमाला दिसत नाही. तर याबाबत विचारलं असता आमिर म्हणाला की, “वेळ खूप मोलाची असते, त्यामुळे ती तुम्ही अत्यंत हुशारीने वापरली पाहिजे,” असं उत्तर आमिरने दिलं आहे. या प्रोमोच्या अंतिम टप्प्यात कपिल शर्मा त्याला फार महत्त्वाचा प्रश्न करतो. तु सेटल कधी होणार आहेस? कपिलच्या प्रश्नाने आमिर खानचा चेहरा पाहण्यासारखा होतो. याचं उत्तर प्रेक्षकांना याशोमध्ये पाहायला मिळणार आहे. (The Great Indian Kapil Sharma Show)

तिसरा विवाह करणार का?

आमिरने याआधी रिना दत्ता आणि किरण राव यांच्याशी विवाह केला होता. मात्र आता तो तिसरा विवाह करणार का? असा सवाल आता कपिल शर्माने विचारला आहे.

News Title – The Great Indian Kapil Sharma Show In Aamir Khan

महत्त्वाच्या बातम्या

…म्हणून IPLमध्ये सचिन तेंडुलकरचा लिलाव कधीच झाला नाही!

रील्स स्टार महिन्याला किती पैसे कमावतात? कमाई ऐकून व्हाल थक्क

“एकच बाप असा भेटला तो शरद पवारांना पुरून उरला…”

ग्राहकांना फटका! ‘या’ बँकेतून पैसे काढता येणार नाहीत; RBI ने घातली बंदी

‘मोदी सरकारने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोड करून गद्दारांचं नाव लिहीलं’