मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव (Shivsena) आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी यावेळी शिंदे गटासह निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. याशिवाय पुढील काळात न्यायालयात या निर्णयावर आव्हान देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हा खोक्यांचा विजय आहे. सत्याचा विजय नाही. श्रीरामाचा धनुष्यबाण जर रावणाला मिळाला, सत्यमेव जयते खोडून असत्यमेव जयते असा केला पाहिजेजो पक्ष बाळासाहेब ठाकरे यांनी लाखों शिवसैनिकांनी रक्त सांडून उभा केला तो पक्ष बाजारबुनगे विकत घेतात. त्यामुळे निवडणूक आयोगावरील विश्वास जनतेने गमावला आहे, असं राऊत म्हणालेत.
महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई ताब्यात घेण्यासाठीचा हा फास आहे. माझा आणि निवडणूक आयोगावर विश्वास नाही असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
- महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी; ठाकरेंच्या हातून शिवसेना गेली
- सर्वात मोठी बातमी; एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण
- नवनीत राणांच्या अडचणीत वाढ!
- चंद्रकांत पाटलांचं महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त वक्तव्य
- अखेर शरद पवार पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्टच बोलले, म्हणाले फडणवीसांनी…