“नकली शिवसेना म्हणायला ती काय मोदीजी तुमची डिग्री आहे का?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Shivsena l देशात लोकसभा निवडणूक सुरु आहे. अशातच निवडणुकीचे दोन टप्पे देखील पार पडले आहे. या दोन टप्प्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही इंडिया आघाडीच्या तब्बल 2.0 या फरकाने पुढे आहोत असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं आहे.

उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले? :

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंची नकली शिवसेना असा उल्लेख देखील केला आहे. अशातच सोलापूरमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रणिती शिंदेंच्या प्रचाराची सभा घेतली आहे. त्या सभेत उद्धव ठाकरेंनी नकली शिवसेना या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.

भाजपची नीती ही “वापरा आणि फेकून द्या अशी आहे. 2014 मध्ये देशात पंतप्रधान झाले ऑक्टोबरमध्ये युती तोडून टाकली आहे. त्यामागे नेमकं कारण काय होतं? तसेच 2019 मध्ये पंतप्रधानपदी बसले तेव्हा देखील अमित शाह यांना वचन सांगितलं होतं. मी माझ्या वडिलांना म्हणजेच बाळासाहेबांना शब्द दिला आहे की शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार असं अमित शाह यांनी मला वचन दिलं होतं.

मात्र नंतर अमित शाह यांनी शब्द मोडला आहे. अशा प्रकारे वापरा आणि फेकून द्या ही भाजपाची नीती आहे असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरेंनी खरपूस शब्दांत टीका केली आहे.

Shivsena l भाजप लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम करतंय -उद्धव ठाकरे

“भाजपा म्हणजे काही ब्रह्मदेव नाही. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी आणि भाजपाच्या विरोधात बोलणारा देशद्रोही असं नाही. नरेंद्र मोदींना मी सांगतो की नकली शिवसेना जे काही आम्हाला हिणवत आहात तसं म्हणायला ती तुमची डिग्री देखील नाही. 4 जूनला तुम्हाला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कोण असली कोण नकली ते नक्कीच समजेल.

यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्ला देखील केला आहे. “हल्ली कुणाला मित्र म्हणायचं म्हणजे पाठ सांभाळावी लागत आहे. कारण सध्याचे मित्र हे पाठीवर वार करणारे आहेत. आजच तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते म्हणजेच भाजपचे येऊन गेले. शिवसेना प्रमुख त्यांना कमळाबाई म्हणायचे. त्यामुळे कमळाबाईचे नेते नरेंद्र मोदी येऊन गेले.

सध्या ते महाराष्ट्रात आणि देशभरात फिरत आहेत. आता ते लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम करत आहेत. त्यामुळे कोपऱ्याला गूळ लागला की धड चाटता पण येत नाही आणि काढता पण येत नाही असा टोला बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.

News Title: Uddhav Thackeray Sharp Reply Over Pm Modi Remark Nakli Shivsena 

महत्त्वाच्या बातम्या

पतंजलीला मोठा झटका, ही उत्पादनं वापरत असाल तर काळजी घ्या!

Covishield लस घेणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठींसह होणार मोठे आजार

अमोल कोल्हेंच टेन्शन वाढलं! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह

राजकारण पेटणार; पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली अत्यंत वाईट टीका

‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार