Ajit Pawar | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमध्ये मतदान पार पडलं आहे. 7 मे रोजी येथे मतदान करण्यात आलं. अगदी सकाळपासूनच बारामतीमध्ये वेगवेगळे आरोप-प्रत्यारोप करण्यात येत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तर थेट पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. येथील निवडणुकीवर सर्वांचंच लक्ष लागलं होतं.
आता निकालात कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल. अशात अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर निशाणा साधत मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आपल्या मनातली सल बोलून दाखवली आहे. शिरूर येथे एका सभेत अजित पवार यांनी मनातली सल सर्वांसमोर बोलून दाखवली.
“पवार साहेब आमचं दैवत आहेत, पण ..”
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. त्यांचं हे विधान आता चर्चेत आलं आहे. पवारसाहेब आमचं दैवत आहेत, पण 80 व्या वर्षानंतर तरी त्यांनी थांबल पाहिजे, नव्या लोकांना संधी दिली पाहिजे, असं म्हणत अजित पवार यांनी शरद पवारांवर टीका केली. शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारानिमित्त अजित दादा (Ajit Pawar) बोलत होते.
“आता किती दिवसं थांबायचं?,आम्हाला चान्स आहे की नाही?”
“मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती. पण केवळ त्यांचा मुलगा नाही म्हणून डावललं गेलं. आम्ही दिवसरात्र काम केलं, सगळा जिल्हा सांभाळला. मीच आता 60 वर्षांच्या पुढे गेलो, आता किती दिवस थांबायचं? आम्हाला कधीतरी चान्स आहे की नाही?”,असा सवाल यावेळी अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपस्थित केला.
पुढे ते म्हणाले की, “मी कामाचा माणूस आहे, मी एखादी गोष्ट मनावर घेतली की ती करतोच. बारामती कशा पद्धतीने बदलली ते एकदा येऊन बघा. अनेक लोकं आम्हाला सांगतात आम्हाला निवडून द्या, आम्ही आपल्या मतदारसंघात बारामतीसारखा विकास करू. म्हणजे आम्ही कायतरी केलंय ना? की तिथं गोट्या खेळलो का? कामच केलंय ना? याचा विचार कुठेतरी करणार की नाही?”, अशा शब्दात अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
News Title – Ajit Pawar on sharad pawar
महत्त्वाच्या बातम्या-
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
पुणे हादरलं! पानटपरीवर घडला धक्कादायक प्रकार
संजोग वाघेरे यांना घरातूनच विरोध!, भावकीतील संदीप वाघेरे यांनी दिली तिखट प्रतिक्रिया
‘दीपिका प्रेग्नंट आहे तरी बेबी बंप का दिसेना?’; चाहत्यांना सतावतेय चिंता
कर्जवाटपासंदर्भात आरबीआयने नियम बदलले; जाणून घ्या नवीन नियम