अण्णा हजारेंच्या जीवाला धोका; महाराष्ट्रात खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

अहमदनगर | 1 मे रोजी अण्णा हजारेंची (Anna Hajare) राळेगण सिद्धीत जावून हत्या करणार, असा इशारा एका नागरिकाने दिलाय. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. अण्णा हजारेंच्या (Anna Hajare) समर्थकांमधूनही भीती व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील निपाणी वडगाव येथील संतोष गायधने या नागरिकाने अशा प्रकारे उद्विग्नतेतून इशारा दिलाय.

शेतीच्या वादातून संगनमताने आपल्या कुटुंबावर अन्याय झालाय, असा आरोप त्याने केलाय. शेतीच्या वादातून गटातील 96 जणांनी संतोष गायधने यांच्या परीवारावर दबाव आणला आहे. कुटुंबावर अनेक खोट्या केस दाखल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली जगतेय, अशी व्यथा संतोष गायधने यांनी मांडली आहे.

दरम्यान, या धमकीमुळे राज्यभरात खळबळ माजलीये. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-