मुंबई | भारत विरोध ओस्ट्रेलिया या एक दिवशीय क्रिकेट सामन्यात भारताचा पराभाव झाला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना पार पडला. यामध्ये ओस्ट्रेलिया संघाने भारत संघाला पराभूत करुण विजय मिळवला.
अहमदाबाद येथे पार पडलेल्या वनडे विश्वचषकात भारताचा पराभाव झाल्याने मोदी स्टेडियमला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. दरम्यान, भारतीय संघाने चांगली कामगीरी केली याबद्दल देखील त्यांचं कौतुक केलं जात आहे. भारताचा परभाव झाल्यानंतर हीटमॅन रोहित शर्मा महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोहित शर्मा कोणता महत्त्वाचा निर्णय घेणार आहे?
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटला लवकरच रामराम ठोकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वनडे विश्वचषकापूर्वीच रोहित शर्माने टी20 क्रिकेटमधील आपल्या भविष्याबाबत बीसीसीआयसोबत चर्चा केल्याचं समोर आलंय.
नोव्हेंबर 2022 मध्ये भारतीय संघाचे टी20 मधील आव्हान संपल्यापासून रोहित शर्माने एकही टी20 सामना खेळला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 सामने खेळले आहेत.
माध्यमांशी बोलत असताना रोहीत म्हणाला की, रोहित शर्माने 148 टी20 सामन्यात 3853 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने टी20 क्रिकेटमध्ये थांबण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांच्या सभेत राडा
पुणेकरांनो काळजी घ्या! नाहीतर होऊ शकतो ‘हा’ आजार
‘जिंकलोच असतो, पण पनवतीने हरवलं’; राहुल गांधींची मोदींवर टीका
पुढील 24 तासांत राज्याच्या ‘या’ भागात पावसाचा अंदाज
अंतरवलीतील हल्ला प्रकरणी मनोज जरांगेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!