“गादीचा आदर तसूभर…”, छत्रपती उदयनराजेंचं नाव घेत किरण माने स्पष्टच बोलले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kiran Mane | अभिनेता किरण माने सतत काही न काही कारणांमुळे चर्चेत राहत असतात. त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यापासून ते राजकीय मते देखील वारंवार मांडत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी आपलं मत नोंदवलं आहे. आता नुकतीच त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

महायुतीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आत्ताचे शाहू महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत. त्यामुळे तुम्ही, आम्ही कोल्हापूरची जनताच खरी वारसदार असल्याचं वक्तव्य केलं आहे. यामुळे मंडलिक यांना सगळीकडूनच टार्गेट केलं जातंय. या पार्श्वभूमीवरच अभिनेते किरण माने यांची पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने यांची पोस्ट

कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी. परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला! असं किरण माने (Kiran Mane) म्हणाले आहेत.

“उदयनराजेंनी मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून..”

ही खूप खूप खूप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही. मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय… ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली… ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं… त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिलं… त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का???, असं किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलंय.

“शाहू छत्रपती भाजपकडून उभे राहिले असते तर..”

यांचे ‘बोलविते धनी’ वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका. कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे, अशी पोस्ट किरण माने (Kiran Mane) यांनी केली आहे.

News Title :  Kiran Mane on Udayanraje Bhosale

महत्त्वाच्या बातम्या-

सुनेत्रा पवारांसाठी प्रचार सभा घेणार का?, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

फिट अँड फाईन लाईफस्टाइलसाठी ‘या’ टिप्स फॉलो करा

“वंचितला मतदान करू नका”; प्रकाश आंबेडकरांविरोधात ‘हा’ नेता मैदानात मैदानात

“…तर राम मंदीर उभारलं नसतं”, राज ठाकरेंकडून मोदींचं तोंडभरुन कौतूक

वसंत मोरेेंचा यू टर्न?, पुन्हा मनसेत जाणार?