Ram Mandir Ayodhya | देशभरात दीपोत्सव अन् रोषणाई; दिल्लीत परतताच मोदींची सर्वसामान्यांसाठी मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Ayodhya | 22 जानेवारी 2024 हा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या दिवसांपैकी एक आहे. याच दिवशी तमाम भारतवासीयांचे स्वप्न पूर्ण झाले अन् अयोध्येतील भव्य मंदिरात रामलला विराजमान झाले. अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू रामललाच्या मूर्तीच्या अभिषेकानंतर देशभरात दिवाळीसारखे वातावरण पाहायला मिळाले. विविध शहरांमध्ये आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. लोकांनी घरोघरी दिवे लावून हा सोहळा सणासारखा साजरा केला.

दीपोत्सवासोबतच लोक फटाकेही फोडून आनंदोत्सव साजरा करताना दिसले. त्याचबरोबर जगातील अनेक देशांमध्ये हिंदू बांधवांकडून हा उत्सव साजरा करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर अनेक भाजप नेत्यांनी देखील सोमवारी राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यानंतर त्यांच्या निवासस्थानी दिवे लावून आनंद साजरा केला.

देशभरात दीपोत्सव!

दरम्यान, राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावरून राजकारण देखील चांगलेच तापले होते. बहुतांश विरोधी नेते अभिषेक सोहळ्यापासून दूर राहिले आणि त्यांच्या प्रतिक्रिया संमिश्र होत्या. काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या अनेक पक्षांच्या नेत्यांना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले होते परंतु त्यांनी जाण्यास नकार दिला. अभिजीत मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामललाचा अभिषेक झाला.

Ram Mandir Ayodhya अन् एकच जल्लोष

रामललाच्या अभिषेक सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आदी सहभागी झाले होते. रामललाच्या अभिषेक सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना संबोधित केले. अयोध्येहून दिल्लीला परतल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींनी सौरऊर्जेसंदर्भात ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’ची घोषणा केली.

 

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या योजनेची माहिती देताना म्हटले, “अयोध्येहून परतल्यानंतर पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करत आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल.”

राम आग नाही राम ऊर्जा आहे – मोदी

रामललाचा अभिषेक सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधानांनी सर्वांना संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, एक काळ असाही होता जेव्हा काही लोक म्हणायचे की राम मंदिर बांधले तर सर्वत्र आग लागेल, अशा लोकांना भारताच्या सामाजिक भावनेचे पावित्र्य समजले नाही. रामललाच्या या मंदिराचे बांधकाम भारतीय समाजाच्या शांतता, संयम, परस्पर सौहार्द आणि समन्वयाचे प्रतीक आहे. आपण पाहत आहोत की मंदिराचे बांधकाम कोणत्याही आगीला जन्म देत नाही तर ऊर्जेला जन्म देत आहे. त्यामुळे राम आग नाही तर राम ऊर्जा आहे.

News Title- After the event at Ram Mandir Ayodhya, Prime Minister Narendra Modi has announced pradhanmantri suryoday yojana for the poor as soon as he arrived in Delhi
महत्त्वाच्या बातम्या –