Sandeep Reddy Vanga | अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिकाचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. तेवढाच तो चर्चेतही राहिला. रणबीरची भूमिका आणि चित्रपटात दाखवण्यात आलेले काही सीन्स वादाच्या भोवऱ्यातही अडकले होते. यावर प्रसिद्ध कवि व लेखक जावेद अख्तर यांनी प्रचंड टीका केली होती. मात्र, आता जावेद अख्तर यांना मोठा सल्ला अॅनिमल चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी दिला आहे.
‘मिर्झापुर’ सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी..
दुसऱ्यांच्या कामावर बोट ठेवण्याआधी जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी आधी आपल्या मुलाचे काम पहावे.”, असा टोला संदीप रेड्डी वांगा यांनी मारला आहे. तसेच यावेळी त्यांनी ‘मिर्झापुर’ या वेबसिरिजचाही हवाला दिला. यामध्ये तर शिव्यांचा भडिमार आहे. मला तर ती सीरिज पूर्णपणे बघवलीही गेली नाही, असं वांगा यांनी म्हटलं.
तुम्ही जर ‘मिर्झापुर’ सीरिज पाहिलीत तर तुम्हाला उलटी येईल. त्यामुळे जावेद अख्तर हे त्यांच्या मुलाच्या कामावर का लक्ष ठेवत नाहीत?, असा सवालही यावेळी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी केला. त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय ते पहायचे कष्ट का घेतले नाहीत?, असा टोलाही जावेद अख्तर यांना मारला.
जावेद अख्तर यांच्या बोलण्यावरुन असे वाटते की त्यांनी माझा ‘अॅनिमल’ चित्रपट बघितलाच नाही. चित्रपट न बघताच त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे. आजवर जेवढ्या लोकांनी या चित्रपटावर टीका केली आहे त्यांनी त्यांच्या आजूबाजूला काय घडतंय ते पहायचे कष्ट का घेतले नाहीत?, असा संतापही यावेळी संदीप रेड्डी वांगा यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते जावेद अख्तर ?
“एका चित्रपटातला एक पुरुष महिलेला म्हणतो की माझे बूट चाट, जर एक माणूस म्हणतो की महिलेला थोबाडीत ठेवून दिली तर काय बिघडलं. असे संवाद असणारा सिनेमा सुपरहिट होणं ही अत्यंत घातक बाब आहे”, अशी टीका जावेद अख्तर यांनी केली होती. यालाच संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान, ‘अॅनिमल’चे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘कबीर सिंग’चीही निर्मिती केली आहे. मात्र, अॅनिमलवर यावेळी अधिक चर्चा आणि टीका झाली. चित्रपटाने 800 कोटींहून अधिक कमाई केली. पण, टीकाही तेवढीच झाली. यात रणबीर व्यतिरिक्त बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्याही मुख्य भूमिका होत्या.
News Title- Sandeep Reddy Vanga on Javed Akhtar
महत्त्वाच्या बातम्या –
घटस्फोटानंतर किरण सोबतच्या नात्याबाबत आमिर खानचा मोठा खुलासा, म्हणाला..
रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?, मोठा खुलासा आला समोर
IND vs ENG: गांगुलीच्या वक्तव्यामुळे गदारोळ; द्रविडची तिखट प्रतिक्रिया, भारताचा विजय पण…
“आम्हाला संपूर्ण जगाशी मैत्री हवी आहे पण…”, Amit Shah यांचा दहशतवाद्यांना इशारा
Narendra Modi | महागाईवरून काँग्रेसवर घणाघात; मोदींच्या लोकसभेतील भाषणातील 10 प्रमुख मुद्दे, वाचा