TMKOC | ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC) या मालिकेतील बबीता आणि जेठालाल यांची केमिस्ट्री तर सर्वांनाच ठाऊक आहे. जेठालालची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) एका कार्यक्रमात पोहोचले होते. तेथेही त्यांना बबीताबद्दल सवाल करण्यात आला. यावर दिलीप जोशी यांनी दिलेली रिअॅक्शन प्रचंड व्हायरल होत आहे.
अभिनेता आमीर खानची मुलगी आयरा खान आणि नूपुर शिखरे यांचा उदयपुरमध्ये विवाह झाल्यानंतर त्यांनी लग्नाचे रिसेप्शन मुंबईत दिले होते. याच पार्टीत दिलीप जोशी यांनी हजेरी लावली होती. मात्र, या ठिकाणी माध्यम प्रतनिधींनी दिलीप जोशी यांना बबीताबद्दल सवाल केला. यावर दिलीप जोशी यांनी अशी काही रिअॅक्शन दिली की त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
दिलीप जोशी यांचा व्हिडीओ व्हायरल
दिलीप जोशी त्यांची पत्नी जयमाला यांच्यासोबत नूपुर आणि आयरा यांच्या रिसेप्शन पार्टीत पोहोचले होते. ‘जेठालाल’ ची भूमिका साकारत असल्यामुळे दिलीप जोशी (TMKOC) यांना कायम बबीताबद्दल सवाल करण्यात येतात. या पार्टीत त्यांची रिअल पत्नी जयमाला यांना बघून माध्यम प्रतिनिधींनी विनोदात ‘बबीताजी कुठेय?’, असा सवाल केला.
View this post on Instagram
या प्रश्नावर दिलीप जोशी जोरात हसताना दिसले. ‘आपल्या घरी असेल दुसरीकडे कुठे असणार’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला. ‘जेठालाल’ ची भूमिका पसंत करणाऱ्या चाहत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. यावर मजेशीर कमेन्ट केल्या जात आहेत.
TMKOC मुळे दिलीप जोशी यांना प्रसिद्धी मिळाली|
सर्वांचे लाडके कॅरेक्टर म्हणजेच ‘जेठालाल’ ची भूमिका साकारणारे अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi) ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या (TMKOC) मालिकेत 2008 पासून अद्याप काम करत आहेत. ते या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतील एका एपिसोडसाठी ते 3 लाख फिस (Celebrity Fees) घेतात.
मालिकेव्यतिरिक्त दिलीप जोशी अनेक चित्रपटांमध्येही झळकले आहेत. हम आपके हे कौन, मैने प्यार किया, या चित्रपटांत त्यांनी साइड रोल केला आहे. आता ते या व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
Atal Setu l बापरे! अटल सेतू पुल बनवायला लागली पृथ्वीला 7 प्रदक्षिणा पूर्ण होतील एवढ्या लांबीची केबल
Job Updates l सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदमध्ये भरती सुरु
Health Tips l मकर संक्रांतीला तीळ गूळ का खाल्ला जातो? जाणून घ्या यामागचे कारण
Ram Mandir | श्री राम अयोध्येत येणार नाहीत, त्यांनी मला स्वप्नात येऊन सांगितलंय; मंत्र्याचा दावा