“Aishwarya Rai नाही, मी अभिषेकची पहिली पत्नी”; अभिनेत्री जान्हवी कपूरच्या दाव्याने उडाली होती खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aishwarya Rai | अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामधील प्रेमाविषयी सर्वांनाच माहीत आहे. 20 एप्रिल 2007 मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक लग्नबंधनात अडकले होते, त्यांच्या नात्याला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, दोघांच्या नात्याची सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या आणि अभिषेक घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याबद्दल खुलासा-

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते. अलिकडच्या काळात मात्र ऐश्वर्या फक्त स्वतःचे आणि लेक आराध्याचेच फोटो टाकत असते त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं होतं. एवढंच नव्हे तर तिच्या नात्याविषयी नवीनच कुजबूज देखील सुरु झाली होती.

ऐश्वर्या राय नेहमी स्वतःचे फोटो टाकते नाहीतर मुलगी आराध्याचे फोटो टाकते. स्वतःच्या अधिकृत अकाऊंटवर ती पती अभिषेकसोबतचा फोटो शेअर करत नसते, असं चाहत्यांचं म्हणणं होतं. त्यावरुन त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, या दोघांच्या नात्याबद्दल आता एक महत्त्वाची माहितीसमोर आली आहे.

अभिषेकची पहिली पत्नी-

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल बाॅलिवूडमधील एका अभिनेत्रीने खुलासा केला आहे. जान्हवी कपूर असं या अभिनेत्रीचं नाव आहे, तीने अभिषेक बच्चनसबोत एका चित्रपटात काम केलं होतं. ‘दस’ या सिनेमात तीने अभिषेकसोबत स्क्रीन शेअर केली आहे. दरम्यान, याच जान्हवी कपूरने एका मुलाखतीत सनसनाटी दावा केला होता. या दाव्यानंतर सीनेसृष्टीत खळबळ उडाली होती. “मी अभिषेकची पहिली पत्नी आहे”, असा दावा तीने केला होता.

नेमकं काय घडलं त्या दिवशी?

ऐश्वर्या (Aishwarya Rai) आणि अभिषेक यांचं लग्न 20 एप्रिल 2007 मध्ये पार पडलं. यावेळी अनेक दिग्गज कलाकारांनी दोघांच्या लग्नाला हजेरी लावली. एकीकडे लग्नाच्या शुभेच्छा देणं सुरु होतं, तर दुसरीकडे अभिनेत्री जान्हवी कपूरने आपल्या हाताची नस कापून घेऊन जीव देण्याचा प्रयत्न केला होता.

एवढंच नव्हे तर त्यानंतर हे प्रकरण आणखी वाढलं होतं. हाताची नस कापून न थांबता जान्हवी कपूर थेट ऐश्वर्या- अभिषेक यांच्या लग्नात पोहचली होती. मात्र, तिला सुरक्षारक्षकांनी लग्नाच्या ठिकाणी सोडलं नव्हतं, त्यामुळे यानंतर होणारा मोठा ड्रामा चुकला होता, मात्र तीने या लग्नस्थळाच्या बाहेर चांगलाच राडा घातला होता.

News Title : aishwarya rai abhishekhs marriage tried to broke by Janhvi Kapoor

थोडक्यात बातम्या-

Hardik Pandyaला आणखी एक लॉटरी लागणार?, Rohit Sharmaच्या नावाचाही होऊ शकतो विचार

मोठी बातमी! Sunil Kedar यांना दुसरा झटका

…तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळेल; Post Office ची जबरदस्त योजना

Hardik Pandya समोर चाहत्यांनी खरोखर “मुंबईचा राजा, रोहित शर्मा” घोषणा दिल्या का?, नवीनच माहिती आली समोर

Brij Bhushan Singh | ब्रिजभूषण सिंह यांना झटका; सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय