नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून किसान अभिमान योजनेकडे पाहिलं जातं. या योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये पैसे पाठवले जातात. प्रत्येकवेेळे ही योजना शेतकऱ्यांसाठी गिफ्ट देत असते. यंदा सुद्धा शेतकऱ्यांसाठी किसान योजनेेनं मोठी घोषणा केली आहे.
पीएम किसान योजनेत (PM Kisan Yojana) वार्षिक 6000 रुपयांच्या वाढीची शक्यता आहे. वार्षिक सहा हजार रुपयांची वाढ होईल. सध्या या योजनेत वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम वाढून ती 8000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. चार टप्प्यात हा हप्ता जमा होऊ शकतो.
या योजनेचा परिणाम येणाऱ्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. जर या योजेनेला केंद्र सरकारने परवानगी दिली तर 20,000-30,000 कोटी रुपयांचं ओझं सरकारच्या तिजोरीवर पडेल. तर दुसरीकडे 2024 याच योजनेसाठी तब्बल 60,000 कोटीरुपयांचे बजेट तयार करण्यात आलं आहे.
यामध्ये अर्थमंत्रालयाचे प्रवक्ते नानू भसीन यांनी यावर भाष्य न करायचं ठरवलं आहे. राज्यात 5 वर्षात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने पिकांवर त्याचा परिणाम दिसून आला. डिसेंबर 2018 पासून सबसिडीचा कार्यक्रम सुरु झाल्यापासून मोदी सरकारने 11 कोटी लाभार्थ्यांना एकूण 2.42 लाख कोटी रुपये वाटप केले आहेत.
थोडक्यात बातम्या –
पोटच्या गोळ्यासाठी ती बिबट्याला जाऊन भिडली, शेवटी…
पुण्यातील पीएसआयचं नशीब चमकलं; 49 रूपयांत जिंकले दीड कोटी
‘…तर रस्त्यावर उतरा’; शरद पवारांचं महिलांना आवाहन
“गरबा खेळायला फक्त हिंदू धर्मीयांनाच प्रवेश द्यावा”
‘आधी आपली पिलावळ सांभाळा’, गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंना इशारा