नवी दिल्ली | प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्टी. प्रेम म्हणजे एक भावना ज्यामुळे माणूस आनंदी राहतो. आरोग्यदायी राहतो. प्रेमाचा शेवट होतो तो ब्रेकअपनी(break up). अनेकदा यातून लोक बाहेर पडतात. खूप लोकं यातून लवकर बाहेर पडतात. काहीनां मात्र हे लवकर जमत नाही. त्या आठवणी, त्या व्यक्तीची आठवण नेहमीच त्रास देते. मुली-मुलं दोघांसाठीदेखील ब्रेकअप पचवणं अवघड असतं.
याचा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावरदेखील दिसून येतो. खाण्यापिण्यावर परिणाम दिसायला लागतो. वजन कमी व्हायला लागतं मात्र असं म्हणलं जात की ब्रेकअप झाल्यानंतर मुलींचं वजन (weight) वाढत. यावर अभ्यास करण्यात आला आहे. अभ्यासानुसार अनेकदा हे प्रत्येकाच्या शरीरयष्टीवर अबलंबून असतं.
दुसरीकडे अभ्यासातून समोर आलं आहे की, अनेकांच वजन वाढलं नाही किंवा कमीदेखील झालं नाही आहे. काही लोकांचं वजन आहे तितकं स्थिर राहिलं आहे,असं अभ्यासातून दिसून आलं आहे. ब्रेकअपनंतर तणाव, चिंताअशा स्थितीत स्ट्रेस हार्मोन्सचं (Stress hormones) प्रमाण वाढतं. यामुळे शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकता. अनेकदा हा स्ट्रेस कमी करण्यासाठी मुलींकडून अनावश्यक अशाप्रकारचं जंकफूड (Junk food) खाल्लं जातं यामुळेदेखील वजन वाढतं.
दरम्यान, शरीरातील स्ट्रेस हार्मान्स न वाढू देण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी तुमचं लक्ष झालेल्या गोष्टीवर न देता दुसरीकडं गुंतवा. कुटुंब आणि फॅमिलीसोबत (family) वेळ घालवा. दररोज फिरायला जाणे,एखादा छंद (hobby) जोपासणं यांसारख्या गोष्टी करा. गरज भासल्यास तज्ञांचा सल्ला घ्या
महत्त्वाच्या बातम्या
- बाबो! सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाला झाला तब्बल ‘इतक्या’ कोटींचा खर्च
- अखेर रेखा बोलली; सिंदूर लावण्यामागचं सांगितलं कारण
- नोटांसारखं आता चिल्लरही काढता येणार; रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची घोषणा
- अदानींचं नाव घेत राहुल गांधींनी सगळंच काढलं; लोकसभेतील भाषण होतंय व्हायरल
- चिंचवडच्या उमेदवारांच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल