मुंबई | रस्त्यावर अपघात घडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. रोज कुठे ना कुठे अपघात होतोच. त्यामुळे लोकांना रस्त्यावर गाडी चालवताना हेल्मेट घालायला आणि रस्त्याच्या कडेने चालतानाही सतर्क रहायला सांगितलं जातं. तरीही दरवर्षी लाखो लोकांचे अपघात होतात. असाच एक भयानक अपघात (Accident) अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर झालाय.
अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ धुक्यामुळे सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून अपघात घडला. या अपघातात सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू (Death) झाला आहे.
पंजाबमधील खन्ना जिल्ह्यात पहाटेच्या सुमारास ही मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघाताचं कारण धुके असल्याचं बोललं जात आहे. या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे अमृतसर दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्नाजवळ सुमारे 100 वाहने एकमेकांवर आदळून हा अपघात घडला. या अपघाता सुमारे 12 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.
सुमारे 100 वाहनांचे नुकसान झालं आहे. अनेक वाहनांची मोडतोड झाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
काही रुग्ण गंभीर असून त्यांना इतर रुग्णालयात रेफर करण्यात आलं आहे. या अपघातात दुर्घटनाग्रस्त झालेल्या वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत, नाही तर त्यांची औकात काय?”
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गौतमी पाटीलचा जलवा, ठाणेकरांना म्हणाली…
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!
शरद पवार मराठा की ओबीसी?; पवारांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी घेतला मोठा निर्णय!