मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगे पाटलांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी फेटाळली असल्याचं कळतंय. कुणबी म्हणून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी ही माहिती दिली.
मराठा समाजाने थोडा संयम बाळगावा. सरकारला थोडा वेळ द्या, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं, सहकार्य कराव असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलय. आमच्यावर विश्वास ठेवा. आम्हाला सहकार्य करा. सर्वसामान्य माणसाला अविश्वास वाटता कामा नये. सकल मराठा समाजाने सहकार्य करावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.
राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जाळपोळ आणि तोडफोडीच्या दुर्देवी घटना होत आहेत. त्यावर सर्वांनी चर्चा केली. शिस्तप्रिय आंदोलनाला गालबोट लागलं. हे आंदोलन हिंसात्मक पद्धतीने होऊ लागलं आहे. यावर आजच्या बैठकीत सर्वांनी नापसंती व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावलं उचलली पाहिजे ही भूमिका घेतली आहे, असं शिंदे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका सरकारची आहे. ती सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचीही आहे. त्यावर सर्वांचं एकमत आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं आरक्षण दिलं पाहिजे ही भावना आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली, असं शिंदे म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पुण्यात 500 मराठ्यांवर गुन्हे दाखल, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका; गॅस सिलेंडर महागला
मराठा आरक्षणावरुन आमदाराचं अत्यंत धक्कादायक वक्तव्य!
“मला बीडला यायला लावू नका”, मनोज जरांगेंनी का दिला असा इशारा?
आता आर या पार!; जरांगे पाटलांनी केली नवी घोषणा