“हिंमत असेल तर पक्षाच्या बॅनरवर ईडी, सीबीआयचे फोटो लावा”, उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. राज्याच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची यादी समोर येऊ लागली आहे. तर दिल्लीमध्ये आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. यावरून आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्लीतून भाजपवर जोरदार हल्ला केला आहे.

उद्धव ठाकरे कडाडले

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) बोलत असताना तिथे केजरीवाल आणि सोरेन यांच्या पत्नीदेखील उपस्थित होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, “केजरीवाल आणि सोरेन यांच्यासोबत केवळ आम्ही नाहीतर पूरा हिंदुस्तान आहे. अरविंद केजरीवाल आणि सोरेन यांना अटक केल्यानं लोकं घाबरतील असं भाजपला वाटत होते. मात्रा आता देशवासियांमध्ये घाबरणारं कोणीही नाही तर लढणारं आहे,” असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले आहेत.

“ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या पार्टी तुमच्या बॅनरवर लावा,”

“जसं आम्ही इंडिया आघाडी घेऊन समोरं आलो तसंच भाजपला चॅलेंज देतो. ईडी, सीबीआय, इनकम टॅक्स या पार्टी आहेत त्या तुमच्या बॅनरवर लावा,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. “किती दिवस त्यांच्यावर टीका करायची? त्यांचा 400 पारचा नारा आहे. एकाच पार्टीचं सरकार देशाला धोकादायक आहे. एक व्यक्ती आणि एका पार्टीचं सरकार चालणार नाही. आपल्याला मजबूत देश पाहिजे,” असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

“तुमचं भविष्य तुम्हाला कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे हे तुमच्या हातामध्ये आहे? आम्ही हितं प्रचार करायला आलो नाही. आम्ही हितं प्रजातंत्राच्या रक्षणासाठी आलो आहे. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं ही पद्धत कोणती आहे?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

“भ्रष्ट लोकं विकास करू शकतात का?”

“भाजपने ज्यांच्यावर आरोप केले त्यांना आपल्याकडे घेतलं आणि वॉशिंग पाऊडरमध्ये टाकलं. त्यांना स्वच्छ केलं आणि आपल्यासोबत घेतलं आहे. जेवढे भ्रष्ट आहेत त्यांना भाजप विकासाच्या मार्गाने घेऊन जाऊ शकेल का? भ्रष्ट लोकं विकास करू शकतात का?”, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

“भाजपमध्ये भ्रष्टाचारी जुमलेबाज लोक आहेत. उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ दिलं गेलं नाही. त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे टाकले. लाठीचार्ज केला. जे सरकार शेतकऱ्यांना आतंकवादी मानतं, शेतकऱ्यांनो तुम्हाला त्यांनी दिल्लीत येण्यापासून रोखलं आता तुम्ही त्यांना दिल्लीत येण्यापासून रोखा”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

News title – Uddhav Thackeray Challenge To BJP

महत्त्वाच्या बातम्या

‘आम्ही मित्रच…’; अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचं मनोमिलन

यंदाची निवडणूक जिंकणार का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

वाढदिवसादिवशी ऑनलाईन केक मागवला अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं, व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! महाराष्ट्रातील बड्या बँकेत मोठा घोटाळा

काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, कारचा चक्काचूर, एकाच कुटुंबातील…