“विचारपूर्वक बोला नाही तर…”, राहुल गांधी यांना निवडणूक आयोगाच्या सूचना

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून अनेकांनी उमेदवार जाहीर केले आहेत. अद्याप निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या नसल्या तरी कोणत्याही क्षणी याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. अशातच निवडणूक आयोगाने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एक सूचना जारी केली आहे. या सूचनेमध्ये त्यांना त्यांच्या वक्तव्याबाबत अधिक सावध आणि जबाबदारीने बोलण्यास सांगण्यात आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशासह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विधानांना दिलेली प्रतिक्रिया यासह सर्व तथ्ये विचारात घेऊन निवडणूक आयोगाने हा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘पनौती’ आणि ‘जेबकतरा’शी संबंधित विधाने पाहता निवडणूक आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये अधिक सावध आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचना

मागील वर्षी डिसेंबरमध्ये दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्य करत आयोगाने राहुल गांधी यांना स्टार प्रचारक आणि राजकीय नेत्यांसाठी नुकत्याच जारी केलेल्या सूचनांचे योग्य पालन करण्यास सांगितले. 1 मार्च रोजी जारी केलेल्या सूचनांमध्ये निवडणूक आयोगाने असा इशारा दिला होता की, पक्ष, उमेदवार आणि स्टार प्रचारकांना आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.

तसेच आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना यापूर्वी नोटिसा मिळाल्या असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा धमकी वजा इशारा निवडणूक आयोगाने दिला. निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या अनेकांची जीभ घसरते. भावना दुखावतील अशी विधानं केली जातात. त्यामुळे आयोगाने ही सूचना जारी केली आहे.

Rahul Gandhi यांचे विधान

राहुल गांधींनी पंतप्रधानांसाठी ‘पनौती’ असा शब्द वापरल्यानंतर आयोगाने गेल्या वर्षी गांधींना नोटीस बजावली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने 21 डिसेंबर रोजी आयोगाला या टिप्पण्यांसाठी गांधींना बजावलेल्या नोटीसवर निर्णय घेण्यास सांगितले होते, असे म्हटले होते की, नोव्हेंबर 2023 मध्ये एका भाषणादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेले विधान चुकीचे होते.

दरम्यान, न्यायालयाचे निर्देश पाहता आयोगाने राहुल गांधींना भविष्यात त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये अधिक सावध राहण्यास आणि विचारपूर्वक बोलण्यास सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी ‘पनौती’ आणि ‘जेबकतरा’शी संबंधित विधाने पाहता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना त्यांच्या सार्वजनिक वक्तव्यांमध्ये अधिक सावध आणि सतर्क राहण्यास सांगितले आहे.

News Title- Election Commission of India has instructed Congress leader Rahul Gandhi to speak carefully
महत्त्वाच्या बातम्या –

“बारामतीची ओळख शरद पवार साहेबांमुळे, म्हणून…”

“मोदी-शहा महाराष्ट्रामध्ये येऊन मनोरंजन करतात”

‘त्या खोलीत रात्रभर…’; अभिनेत्री करिना कपूरने करिश्माबद्दल केला सर्वात मोठा खुलासा

नवनीत राणा यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

“भारत माता की जय मान्य नाही”; ‘या’ खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य