पुणे | 14 वर्षांपासून प्रेमसंबंध असून लग्न करण्यास नकार दिल्याने प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनीषा गेडाम असं मृत मुलीचं नाव आहे. पुण्यातील चंदननगर परिसरात घडलेल्या या घटनेनं पुण्याला हादरवून सोडलं आहे.
एकदा शेवटचं भेटण्याच्या बहाण्याने या प्रियकराने मनीषाला बोलावून घेतलं होतं. खून केल्यानंतर तब्बल 17 दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर चंदन नगर पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली असून सागर गुडाव असं आरोपी प्रियकराचं नाव आहे.
अमरावतीचे रहिवासी असलेल्या मनीषा आणि सागर दोघांमध्ये गेल्या 14 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र कुटुंबाच्या विरोधामुळे मनीषाने सागरसोबत लग्न करण्यास नकार दिला होता. तसेच सागर मनीषाला रोज फोन करत होता. मात्र ती त्याच्या फोनला सुद्धा प्रतिसाद देत नव्हती. याच रागातून त्याने मनीषाचा खून केल्याची माहिती आहे.
13 मार्चला दोघेही भेटले आणि सागर मनीषाला दुचाकीवरुन घेऊन निघाला आणि भाटघर धरणाच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी गेल्यावर मनीषा बेसावध असताना तिच्या डोक्यात दगड घालून तिचा खून केला. त्यानंतर सागर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी आरोपी सागर गुडावला अटक केली असून त्याची कसून चौकशी करत आहेत. या गुन्ह्यात त्याला कुणी मदत केली याचा तपास करत आहेत. मात्र या घटनेनं महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचे धक्क्यावर धक्के, ‘या’ नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
उत्तर प्रदेश पोलिसांची अब्रू धुळीला, पोलिसासमोर चोरांनी गाडी नेली चोरुन!
नणंदेच्या नवऱ्याच्या प्रेमात आकंठ बुडाली, त्यानंतर तीनं जे पाऊल उचललं ते अत्यंत धक्कादायक!
पुण्यातील कोरोनाबाधितांची आजचीही आकडेवारी धक्कादायक
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली कोरोनाची लस; नागरिकांना केलं ‘हे’ आवाहन
Comments are closed.