मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुडीपाडवा मेळावा काल पार पडला. यावेळी संबोधित करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार निशाणा साधला. तर राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही टीकेची झोड उठवली.
राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला आहे. लोक सुट्टी असली की एखादा छान बोलणारा वक्ता असला की जातात भाषणाला हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, असा टोला आव्हाडांनी लगावला आहे.
राज ठाकरे हे महाराष्ट्रातील एकमेव असे नेते आहेत जे दर पाच वर्षांनी रंग बदलतात. यांच्या इतका सरडा पण रंग बदलत नाही, की जितक्या गतीने राज ठाकरे रंग बदलतात. यांच्या भाषणाला इतक्या गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी कोण चालवतं म्हटलं तर ते उद्धव ठाकरे चालवतात, असं वक्तव्य देखील जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“पवार साहेब, उतार वयात विस्मरणाचा रोग जडला की कोलांट्या मारण्याची सवय?”
Raj Thackeray: “जो माणूस इतिहास विसरला, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला”
“हिंदू म्हणून आपण एक कधी होणार?”, राज ठाकरेंचा सवाल
जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
Raj Thackeray: “झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका”, राज ठाकरेंची मागणी
Comments are closed.