आमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी
गुवाहाटी | सध्या देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी मतदान प्रकिया पार पडत आहेे. तर काही ठिकाणी आचारसंहिता देखील लागली आहे. काही राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना पहायला मिळत आहे. भाजपचे सर्व नेते या निवडणुकीत जोर लावताना दिसत आहेत तर, काँग्रेसकडून खासदार राहुल गांधी यांच्यावर या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान राहुल गांधी यांनी आसामच्या प्रचारादरम्यान भाजपवर परखड टीका केली आहे.
काँग्रेसने नेहमी दिलेली आश्वासने पाळली आहेत. राज्यात विधानसभा जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेेसचा इतिहास आहे. आमचा पक्ष भाजप सारखा नाही. आम्ही आसामच्या लोकांना पाच प्रमुख मुद्यांवरून शब्द दिला आहे. तो आम्ही पाळणार आहोत. पंजाब, छत्तीसगढ, कर्नाटक या राज्यात आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं, ते आम्ही सत्तेत आल्यावर पुर्ण केलं, असं राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी आसामच्या लोकांना पाच प्रमुख मुद्यांवरून शब्द दिला आहे. नागरिकत्व दुरूस्ती कायदा आसाममध्ये लागू करणार नाही, पाच लाख तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार, सर्व घरांमध्ये 200 युनीट वीज मोफत उपलब्ध करून देणार, प्रत्येक गृहिणींना 2000 रूपये वार्षिक सहाय्यता देणार, चहा मळ्यातील कामगारांची रोजंदारी 365 रूपये करणार, अशी आश्वासने या निवडणुकीत काँग्रेसने दिली आहेत.
दरम्यान, छायगाव आणि बर्खेत्रीच्या निवडणूक रॅलीपुर्वी राहुल गांधी यांनी नीलांकलच्या शक्तिपीठ येथे जाऊन पूजा केली. परंतू खराब वातावरणामुळे सिलचर आणि हफलाँग येथील रॅली रद्द करण्यात आली आहे. येत्या 6 एप्रिलला आसाममध्ये 40 ठिकाणी मतदान होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारी करताना दिसत आहेत.
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…
रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!
“…तर मुंबईत दिवसाला 10 हजार कोरोना रूग्ण आढळतील”
देवेंद्र फडणवीस- जितेंद्र आव्हाड यांच्यात रंगलं ट्विटर वाॅर; कारण ठरले अनिल देशमुख
‘वाघांच्या राज्यात लांडग्यांची चलती कशी?’; प्रकाश आंबेडकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.