मुंबई | केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी धान्य खरेदीवरून राज्य सरकारवर टीकी केली आहे.
केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही त्यामुळे शेतकऱ्यांंचं नुकसान होत असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे.
मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला असल्याचं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्य सरकारने यावर्षभरात धान्याचे किती उत्पादन होणार आहे याचा आढावा घेऊन राज्याला किती मका खरेदीची आवश्यकता आहे हे केंद्राला स्पष्टपणे सांगणं आवश्यक आहे. मात्र राज्य सरकार ही माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे आणि याचा फटका शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचं दानवे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
विधान परिषद निवडणुकीत गैरप्रकार झाला, मतदान EVM मशीनवर घ्या- चंद्रकांत पाटील
“दादा बंगालचा वाघ, भाजपमध्ये आल्यास त्याचं नक्कीच स्वागत करु”
‘होळकरांचा वाडा इतके दिवस फुकट वापरलात’; नाव घेता पडळकरांची शरद पवारांवर टीका
जगात भ्रष्टाचाराचे नवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्यांसाठी असते का एखादे भारतरत्न- भाजप