सोलापूर | राज्य सरकारने लाकडी निंबोडी उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी दिलेली आहे. या योजनेनुसार उजनी धरणातील पाणी इंदापूर आणि बारामतीला मिळणार आहे. विरोधकांकडून उजनीचे पाणी पळविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप करण्यात येत आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
पालकमंत्री हे जिल्ह्याचे पालक असतात. परंतु, हे पालकमंत्री जिल्ह्याला कुपोषित ठेवत आहेत, असा हल्लाबोल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते रणजित बागल यांनी केला आहे. प्रसंगी रक्त सांडू पण एक थेंबही जाऊ देणार नाही, असा इशारा रणजित बागल यांनी दिला आहे.
दरम्यान, पालकमंत्र्यांकडून जिल्ह्याचा अपेक्षाभंग झाला आहे. भरणे मामांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गोड बोलून मामा बनविण्याचे काम केले आहे. उजनीचे पाणी देण्यास आमचा कडाडून विरोध आहे. सोलापूरचे शेतकरी पेटून उठले आहेत. त्यांचा आवाज म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे, असं रणजित बागल यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांना धमकी
नारायण राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; पुन्हा नोटीस जारी
“सोनिया गांधींच्या सांगण्यावरून मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण…”
‘शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळत असल्याने केंद्र सरकारला पाहवत नाही’
मोठी बातमी ! राज ठाकरेंवर 1 जूनला शस्त्रक्रिया होणार
Comments are closed.