औरंगाबाद | औरंगाबादचा पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. कालच मी पराभव पाहण्याच्या अगोदर मेलो का नाही, असं वक्तव्य माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरेंच्या पराभवावर भाष्य केलं आहे.
औरंगाबाद लोकसभेतला पराभव फक्त चंद्रकांत खैरेंचा झालेला नाही. तर तो माझा म्हणजे उद्धव ठाकरेंचा झालाय, असं ते म्हणाले. पण आम्ही पराभवाने शांत बसणारे नाहीत. आम्ही पुन्हा एकदा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निकाल लागल्यानंतर सामनाच्या अग्रलेखातून देखील, ‘…तर संभाजीनगरवर हिरवं फडकं कधीच फडकलं नसतं’, अशी जहरी टीका आणि पराभवाची खंत व्यक्त केली होती.
दरम्यान, चंद्रकांत खैरे तुम्ही काळजी करू नका, पुढचा विजय आपला आहे, असा विश्वास त्यांनी खैरेंना दिला.
महत्वाच्या बातम्या
-आदित्य ठाकरे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री???
-तुम्ही चिंता करु नका, शांत राहा; आमचं सगळं ठरलंय!
-धोनी झुकणार की आयसीसीचा निर्णय झुगारणार?
-११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन मृतदेह स्मशानभूमीत फेकला
-धक्कादायक! गेल्या ६ वर्षात ग्रामीण युवकांच्या बेरोजगारीत ३ पटींनी वाढ
Comments are closed.