मुंबई | राज्यात सध्या उपमुख्यमंत्री बदलणार असून त्याजागी काँग्रेस पक्षाचा उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यावर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काँग्रेसचा उपमुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असं म्हणत अजित पवार यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घेतलेले आहेत, ते संपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आम्ही करतो, असं अजित पवारांनी सांगितलं.
दरम्यान, प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात बाकीच्यांनी चर्चा करण्याचं कारण नसल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी”
शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले…
आदित्य ठाकरेंनी उडवली मनसेची खिल्ली, म्हणाले…
ठाकरे सरकारने पंकजा मुंडेंचं ‘ते’ धोरण ठेवलं कायम
“अमिबालाही लाज वाटेल अशी शिवसेना दिशाहीन झाली आहे”