बारामती | राज्यकर्ते आणि हितसंबंध घटक मराठा आंदोलनाला बदनाम करत आहेत.तसंच मराठा आणि बहूजन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्याला बळी पडू नये, असं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीाला कोणाचीच हरकत नाही. पण कोणताही पुर्वग्रह न ठेवता तसंच इतरांच्या आरक्षणालाही धक्का न लागता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असंही त्यांनी पत्रकात म्हटलंय.
दरम्यान, हिंसा, जाळपोळ , सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान हे प्रकार आंदोलकांनी टाळावेत, आंदोलकांनी शांततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असंही ते म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-हिंमत असेल तर सरकारने आरक्षणमुक्त समाज तयार करावा!
-पुजारा आऊट होताच विराटने मैदानावरच हासडली शिवी!
-मोदींमुळे केंद्रीय मंत्र्यांना सध्या काही कामच उरलं नाही!
-वैभव राऊतचा ‘सनातन’शी संबंध सिद्ध झाला नाही- दीपक केसरकर
-मराठा आंदोलनादरम्यान एमआयडीसी तोडफोड प्रकरणी 41 जण पोलिसांच्या ताब्यात