पुणे | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी संभाजी ब्रिगडेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा समाजाच्या काही संघटनांनी पंढरपूरमध्ये साप सोडणे, हिंसा करणे, चेंगराचेगरी करणे असं षडयंत्र रचलेलं आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला होता. त्या वक्तव्यावरून गायकवाडांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे 15 लाख वारकऱ्यांमध्ये भीतीचं, असंतोषाचं वातावरण तयार झालं आहे, त्यामुळे त्यांनी मराठा समाजाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीय.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा मोर्चेकऱ्यांसोबत आता विदर्भवादीही मुख्यमंत्र्यांविरोधात आक्रमक
-मराठा आरक्षणासाठी राणे पिता-पुत्र आक्रमक!
-मराठा मोर्चेकरी काकासाहेब शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात तीव्र संताप
-मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी घेतलेल्या तरुणाचा मृत्यू
-मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला घुसल्या, मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
-शिवाजी महाराजांना कोणी कमी लेखत असेल खपवून घेणार नाही- अजित पवार