अमरावती | शेतकरी कर्जमाफीच्या हिशोबात बँकांकडून जाणूनबूजून गडबड होत असल्याची तक्रार अनेक शेतकऱ्यांनी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत बच्चू कडू यांनी सरकारकडे एक अहवाल सादर केला आहे.
एखाद्या शेतकऱ्याने पन्नास हजाराचं कर्ज घेतलं असलं तर बँकांनी त्यावर एक ते दीड लाख व्याज लावलेलं आहे. नियमानुसार कर्जाऊ घेतलेल्या रकमेच्या दुप्पट व्याज आकारलं जाऊ शकतं, त्याहून अधिक नाही. मात्र, काही जिल्हा व राष्ट्रीय बँकांनी तीन ते चारपट व्याज लावल्याचं बच्चू कडू यांच्या निदर्शनास आलं आहे.
शेतकऱ्याने जितकं कर्ज घेतलं आहे, त्याच्या दुपटीपेक्षा जास्त व्याज बँकांना आकारता येत नाही. अशा काही तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. यासंदर्भात सरकारकडे अहवाल दिला आहे, असं बच्चू कडू म्हणाले आहेत.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीची यादी सरकार जाहीर करत असताना दूसरीकडे बँकांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
इथून पुढे मी माझा पगार समाजासाठी वापरेल- रोहित पवार
नरेंद्र मोदी पाठीवर दंडे खातील पण तरूणांना रोजगार देणार नाहीत- नितीन राऊत
महत्वाच्या बातम्या-
इंटरनेट हा मूलभूत अधिकार नाही- रविशंकर प्रसाद
भावाशी, मिसळचं झटको होयो तर येवा वैभववाडीत!
धक्कादायक; मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ती घोषणा फसवी!
Comments are closed.