वर्धा | राज्यातील शेतकरी आत्महत्यांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता वर्धा जिल्ह्यातील मिरापूर गावात कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
परमेश्वर गेडाम असं या शेतकऱ्याचं नाव आहे. त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेतला. परमेश्वर यांच्यावर जिल्हा बँकेचे 45 हजार रुपयांचे कर्ज होते, तसेच चालू हंगामाकरता त्यांनी 60 रुपयांचे बी-बियाणे आणि खते उधार घेतली होती, अशी माहिती आहे.
दरम्यान, परमेश्वर यांचा मुलगा चंद्रशेखर यांनी याप्रकरणी अल्लीपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या–
-कर्जबाजारी बापाचा भार हलका करण्यासाठी शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या
-बेडुक आणि बेडकीनीचं लगीन; भाजपच्या मंत्री प्रमुख पाहुण्या!
-बिहारमध्ये काश्मीरची पुनरावृत्ती?; भाजप नितीश कुमारांनाही धक्का देणार???
-‘एक बार मैने कमिटमेंट कर ली, तो मै खुद की भी नही सुनती’
-पाकिस्तानचा हा खेळाडू गांजाडा!!! अंमली पदार्थ चाचणीत दोषी
Comments are closed.