मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेच घेतली. वीजबिलासंदर्भात भेट घेतली असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
2 हजार बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, हे सरकार कुंथत कुंथत चालत आहे. सरकारचे धरसोड धोरण आहे, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली- राज ठाकरे
कोरोना लसीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला
‘…म्हणून पाकिस्तानने विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका केली’; पाकिस्तानी मंत्र्याच्या खुलासा
Comments are closed.