‘एकनाथ शिंदे फ्लोअर टेस्टसाठी जाणार नाहीत’, प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
मुंबई | महाराष्ट्राच्या सत्ता नाट्याचा पुढील अंक सर्वाैच्च न्यायालयात सुरु आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात नोटीस पाठवल्या होत्या. त्यांना आव्हान करत शिंदे गटाने थेट सर्वौच्च न्यायालयात धाव घेलली होती. काल सोमवारी यावर सुनावणी झाली. यात न्यायालयाने 16 आमदारांना दिलासी दिला आहे. सोमवारीपर्यंत या नोटीसांना उत्तर देण्याची मुदत नरहरी झिरवळ यांनी दिली होती. आता न्यायालयाने मुदत वाढवून ती 11 जुलै केली आहे.
सर्वौच्च न्यायालयात शिंदे गटाने दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घेतल्याचं नमुद केलं आहे. परंतु अद्याप त्यांनी राजभवनाला अधिकृत पत्र देऊन तशी माहिती दिली नाही.
वंचित बहुुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर आता भाष्य केलं आहे. आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे हे फ्लोअर टेस्टसाठी तयार नाहीत असं सांगितलं. त्यासाठी त्यांनी कारणे सुद्धा दिली आहेत. सभागृहात प्रेसिडींग सुरु झाल्या तर आमदार बरखास्तीची कारवाई होऊ शकते, अशी भीती त्यांना वाटत असावी. कारण ते अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहेत. बैठकीला उपस्थित न रहाणं हा जर शिवसेनेच्या घटनेत गुन्हा असेल तर उपाध्यक्ष तशी कारवाई करु शकतात, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हंटलं.
सध्याचं राजकीय वातावरण शांत करण्याच्या हेतूने कोर्टाने हा निर्णय दिला आहे. जोपर्यंत भाजप आपली भूमिका स्पष्ट करत नाही, तोपर्यंत नवीन सरकार की मध्यावर्ती निवडणूका हे ठरु शकत नाही. न्यायालय सभागृकाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करु शकत नाही. त्यामुळे न्यायालय लवकरच यावर योग्य तोडगा काढेल.
थोडक्यात बातम्या –
म्हैसाळमधील 9 जणांच्या आत्महत्याप्रकरणी अत्यंत धक्कादायक खुलासा!
पत्रकारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी बातमी, ‘या’ पत्रकाराला अटक!
महाराष्ट्राच्या सत्तानाट्यात ‘ही’ आहे भाजपची भूमिका, मुनगंटीवार म्हणतात…
शिंदे-ठाकरेंमध्ये सत्तासंघर्ष सुरु, इकडे दोन कलाकारांमध्ये वातावरण पेटलं!
शिवसेनेला आणखी एक झटका!, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांचं मोठं वक्तव्य
Comments are closed.