नवी दिल्ली | आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धादांत खोटी माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्याला विशेष राज्याचा दर्जा देता येणार नाही, असं वित्त आयोगाच्या अहवालात कुठेही म्हटलं नाही. हे आयोगाचे सदस्य गोविंद राव यांनी आधीच सांगितलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे हात कशामुळे बांधले आहेत, हे मोदींनी जाहीर करावे, असं चंद्राबाबूंनी म्हटलं आहे.
दरम्यान, संसदेत अविश्वास ठरावावेळी आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यास सरकारचे हात बांधलेले आहेत, असं मोदींनी म्हटलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या–
-…तर मनसेचं आंदोलन तीव्र करू; राज ठाकरेंचा इशारा
-प्रफुल्ल पटेल यांच्या मुलीच्या लग्नात राजकारणी ते बॉलिवुडमधील दिग्गजांची हजेरी!
-…असं झालं तर लवकरच भारतात आयफोनवर बंदी येणार!
-संतप्त मराठ्यांनी शिवसंग्रामच्या विनायक मेटेंना पळवून लावलं
-शिवसैनिकांसारखे बना; छगन भुजबळांचा कार्यकर्त्यांना सल्ला