नवी दिल्ली | देशव्यापी लॉकडाऊन सुरू होऊन जवळपास दीड महिना पूर्ण झाला आहे. तरीदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रिय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही. भारत तोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार आहे, असं डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोरोनाने कितीही गंभीर परिस्थिती निर्माण झाली तरी सरकार पूर्णपणे सक्षम आणि तयार असल्याचं ते यावेळी म्हणाले. तसंच विकसित देशांमध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी परिस्थिती आपल्याकडे होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
करोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा एकदा वाढला आहे. वेग वाढून तो 12 दिवसांवरून आता 10 दिवसांवर आला आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या राज्यांमध्ये केंद्राची पथके सातत्याने पाहणी करत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी शुक्रवारी दिली.
ट्रेंडिंग बातम्या-
आम्हा राजकारण्यांना काही लाज आहे की नाही?; औरंगाबाद दुर्घटनेनंतर सुरेश धस अस्वस्थ
कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे
महत्वाच्या बातम्या-
रेल्वेखाली चिरडून मरण पावलेले कोरोना आणि लॉकडाऊनचे बळी- संजय राऊत
आज फिर हमने दिल को समझाया; दुखा:त बुडालेल्या मेधा कुलकर्णींचं ट्विट
‘अरे रडताय काय मी, आहे ना तुमच्यासाठी…’ दुखावलेल्या कार्यकर्त्यांची पंकजांनी घातली समजूत
Comments are closed.